जिल्हा बँकेमुळेच शेतीमध्ये हरितक्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:32+5:302021-02-05T07:25:32+5:30
अंकलखोप (ता. पलूस) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला, यावेळी ते बोलत होते. ...

जिल्हा बँकेमुळेच शेतीमध्ये हरितक्रांती
अंकलखोप (ता. पलूस) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला, यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, सर्वच शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेत जाऊन कर्ज घेत नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा आधार आहे. कर्मचारी वर्गाची ग्राहकांशी आपुलकीची वागणूक असते. त्यामुळे ग्राहकांना ही बँक आपली असल्यासारखी वाटते. येथील शेतकरी वर्गाला मध्यम मुदतीची शेतीकर्जे वेळेत उपलब्ध झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून प्रगती साधली आहे.
यावेळी बाजीराव (आप्पा) पाटील सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजीरावआप्पा पाटील पतसंस्थेचे संस्थापक हणमंत पाटील, महेश चौगुले, यशवंत नवले, बँक निरीक्षक रणधीर पाटील, शाखाधिकारी शोभा साळुंखे आदी उपस्थित होते. अभिजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हिम्मत पाटील यांनी आभार मानले.
फोटो :०२अंकलखोप१
फोटो : अंकलखोप (ता. पलूस) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा वर्धापनदिनास उदय पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते.