शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

उत्पादकांकडून द्राक्षबागांना ‘सेंद्रीय मात्रा’!

By admin | Updated: January 7, 2015 00:03 IST

नावीन्यपूर्ण प्रयोग : लिंबूचा रस, ताक, मैदा, पाल्याचा खत म्हणून वापर

प्रवीण जगताप -लिंगनूर -सांगली जिल्ह्यातील द्राक्षोत्पादक आपल्या शेतीतून दर्जेदार, निरोगी द्राक्षे उत्पादित करण्यासाठी अनेक तऱ्हेने आपला आटापिटा करीत आहेत. रासायनिक खते व औषधे यांच्या अतिवापराने द्राक्षझाडे कमकुवत बनविण्यापेक्षा आणि आपली द्राक्षे केवळ घडांनी नव्हे, तर आरोग्यवर्धकही रहावीत यासाठी आता रासायनिक मात्रेबरोबर सेंद्रीय मात्रेचा उपयोग करू लागले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये स्वानुभवाने व काही केवळ प्रयोग म्हणून द्राक्षशेती सुरक्षित, आरोग्यदायी व दर्जेदार द्राक्षोत्पादनासाठी त्यांचा वापर सुरू केला आहे.मागील दहा वर्षांपासून काही प्रयोगशील व धाडसी द्राक्षोत्पादक करीत असून, त्यांची संख्या ३० ते पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये काही प्रयोग हे पारंपरिक आहेत, तर काही प्रयोगांचा दरवर्षी नव्याने काही द्राक्षोत्पादक करीत आहेत.हे प्रयोग म्हणजे द्राक्षशेतीवरील सेंद्रीय मात्राच म्हणावी लागेल. या सेंद्रीय मात्रेमध्ये जनावरांचे कातडे, चपला निर्मितीतील टाकाऊ तुकडे, गूळ, लिंबाचा रस, गोमूत्र, शेण, ताक, बेसन पीठ, मैदा, उसाचा वाळलेला पाचोळा, वाळलेले गवत यांचा प्रामुख्याने समावेश होतो.विशेषत: कातडी, चप्पल निर्मितीचे कारखाने व उद्योग ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कातड्याचे टाकाऊ तुकडे मिळतात. येथील टाकाऊ तुकडे व कच्च्या मालाची स्वस्तात खरेदी करून नवीन द्राक्षबागेची लागण करताना याचा वापर करतात. द्राक्षबागेच्या नव्या लागणीसाठी खोदलेल्या चरीमध्ये या कातड्यांचे तुकडे टाकल्यास त्याचे दीर्घकाळ सेंद्रीय खत म्हणून उपयोग होतो. त्याचा पुढे रोपांच्या वाढीसाठी व दर्जासाठी फायदा होतो; तर गोमूत्राचा वापरही झाडांना केला जातो. गोमूत्र, गूळ, बेसन पीठ यांचे द्रावण व मिश्रण रोपांच्या मुळाशी ओतले जाते. गुळातून मिळणारे कॅल्शिअम झाडांना मिळू शकते तसेच गोमूत्र व शेणामुळे झाडास सेंद्रीय मात्रा मिळून झाडाच्या मुळीची कार्यक्षमता वाढते, तर या मिश्रणातून मिळणारे पोषक घटक रोपाला दीर्घकाळ मिळून त्याचा दीर्घकाळ लाभ होतो, असे त्या द्राक्षोत्पादक ांनी अनुभवले आहे.तसेच द्राक्षघड तयार झाल्यानंतर झाडांच्या वरच्या बाजूला लिंबाचा रस पाण्यात मिसळून वर्षातून एखादा स्प्रे मारल्यास माल तयार झाल्यानंतर मण्यांना टोकाला येणारा अनावश्यक लालसर गुलाबी रंग येत नाही. त्यामुळे त्याचा बेदाणा निर्मितीत व मार्केटिंगवेळीही दर्जात लाभ होतो. त्यामुळे अशा द्राक्षांना व बेदाण्याला चांगले मार्केट व दर मिळणे शक्य होते, तर रासायनिक औषधांच्या अतिवापराने व फवारणीनंतर झाडाला काही काळ कमकुवतपणा निर्माण होतो.या कमकुवतपणातून बाहेर पडण्यासाठी व ताण कमी करण्यासाठी ताकाचा उपयोग होतो. त्यामुळे पाने ताकदवान व सुदृढ राहतात. पाचोळ्याचा उपयोग मल्चिंगसारखामागील अनेक वर्षांपासून द्राक्षांच्या झाडाखाली मल्चिंगसारखा उपयोग होईल म्हणून उसाचा वाळलेला पाचोळा व गवताचा पाचोळा यांचा उपयोग केला जात आहे. या पाचोळ्याचा झाडाच्या मुळाशी एकप्रकारचा जाड थर टाकला जातो. यामुळे मुळाशी पाण्याचा वापसा व मुळाजवळील पाण्याची ओल याचे नैसर्गिक नियंत्रण शक्य होते. तापमानही काहीअंशी मुळाजवळ नियंत्रित होते. त्याचा द्राक्षघड व माल तयार होताना चांगले लाभ होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा सेंद्रीय मात्रांमुळे द्राक्षे दर्जेदार निरोगी व खाण्यास लायक बनत आहेत. तर रासायनिक मात्रांना काही अंशी पर्यायही निर्माण होत असून, त्यांचा प्रयोगशील द्राक्षोत्पादक प्रयोग करीत आहेत.