शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भू-विकास बँकांकडील थकित रकमेचा शासकीय गोंधळ

By admin | Updated: June 16, 2014 12:09 IST

राज्यातील भूविकास बँकांना हमीपोटी दिलेल्या रकमेला कर्जरुपाने मांडत सहकार खात्यातील अधिकार्‍यांनी नवा गोंधळ घातला आहे.

संघटनेकडून पाठपुरावा : ८२३ कोटींच्या रकमेबाबत शासनाकडून एकदाही बँकांना सूचना नाही
 
अविनाश कोळी■ सांगली
 
राज्यातील भूविकास बँकांना हमीपोटी दिलेल्या रकमेला कर्जरुपाने मांडत सहकार खात्यातील अधिकार्‍यांनी नवा गोंधळ घातला आहे. बँकांकडून ८२३ कोटी रुपये येणे असल्याचे सांगणार्‍या शासनाने आजवर एकदाही बँकांना त्याबाबत पत्र किंवा नोटीस पाठविली नाही. या रकमेवर व्याजाचीही मागणी शासनाने केल्याने संघटनेने यास विरोध केला आहे. 
राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर अभ्यास समिती नियुक्त होऊन त्याचा अहवालही शासनाकडे सादर झाला आहे. यासंदर्भात सहकारमंत्र्यांबरोबर संघटनेच्या पदाधिकार्‍यांची नुकतीच एक बैठक पार पडली. शासनाला काही मुद्दे पटले असले तरी अद्याप शासनाने बँकांच्या माथी दर्शविलेल्या रकमेबाबतचा तिढा सुटलेला नाही. नाबार्डसाठी हमीपोटी शासनाने ८९६ कोटी रुपये दिले होते. यापैकी ७३ कोटी बँकांनी जमा केले. मुद्दलापोटी ही रक्कम जमा करून शासनाने ही रक्कम कर्ज म्हणून दाखविली आहे. ७0 कोटी वजा करून उर्वरित ८२३ कोटी रक्कम व त्यावरील व्याज ७२२ कोटी थकबाकी म्हणून दाखविले आहे. वास्तविक हमीपोटी दिलेल्या रकमेला कर्ज म्हणून दर्शविता येत नाही. त्यामुळे सहकार विभागातील अधिकार्‍यांनी हा घोळ घातला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 
शासनाने हमीपोटी दिलेल्या रकमेतून मुद्दल वजा केल्यानंतर जेवढी रक्कम राहते त्याबाबत संघटनेचे दुमत नाही. एकरकमी परतफेड योजना, कर्जमाफी, सवलत अशा माध्यमातून शासनाकडून बँकांना येणे असलेली रक्कम ७२३ कोटी रुपये आहे. हमीपोटीच्या शिल्लक रकमेतून ही रक्कम वजा केल्यास केवळ १00 कोटी ६७ लाख एवढेच देणे शासनाला लागते, असा मुद्दा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मांडला आहे. शासनाने हमीपोटीच्या रकमेवरील व्याजाचा विचार सोडून द्यावा. बँकासुद्धा शासनाकडून येणे असलेल्या रकमेवरील व्याजाचा विचार सोडून देतील. समन्वयाने हा तोडगा निघाला तर थकित रकमेचा घोळ सुटू शकतो. हे सर्व आकडे अधिकार्‍यांच्या गोंधळामुळे झाले असल्याचा संघटनेचा दावा आहे. 
शासनाने अद्याप थकित रकमेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. बँकांना सभासदांकडून येणे असलेली रक्कम जवळपास ८५१ कोटी रुपये आहे. शासनाचे खर्‍या अर्थाने जे देणे लागते ते भागवून बँकांच्या पदरी मोठी रक्कम राहू शकते. शासनाला बँकांच्या पुनुरुज्जीवनाकरिता वेगळी मेहनत घेण्याची गरज नाही, असे पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. 
अधिकार्‍यांकडून दिशाभूल
तिजोरीवर कोणताही भार न देताही राज्यातील भू-विकास बँकांचा प्रश्न सुटू शकतो, असे संघटनेचे म्हणणे आहे. 
■ संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या अधिकार्‍यांनी दिशाभूल करणारी आकडेवारी सादर केली आहे. हमीपोटी दिलेल्या रकमेला कर्जरुपाने मांडण्यात आले आहे. वास्तविक एवढी मोठी रक्कम व त्यावरील व्याज बँकांकडे थकित असते तर त्यांनी इतक्या वर्षात एकदा तरी पैसे भरण्याबाबत बँकांना सूचना केली असती. अशी एकही सूचना बँकांना आली नाही. या रकमेची शासकीय दफ्तरी नोंद तरी आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाने त्या रकमेवर व्याज घेऊ नये. आम्हीसुद्धा शासनाकडून येणे असलेल्या रकमेवर व्याज मागणार नाही. 
■ बँकांकडून शासनाला देणे लागत असलेल्या रकमेबाबत अधिकार्‍यांनीच दिशाभूल केली आहे, असे संघटनेचे मत आहे. दुसरीकडे अधिकार्‍यांनी अजूनही थकित रकमेचा व व्याजाचा मुद्दा सोडलेला नाही. 
■ शासनाने ज्याप्रमाणे हमीपोटी दिलेल्या रकमेच्या व्याजाची मागणी केली आहे, तशीच मागणी संघटनेने शासनाकडून येणे असलेल्या रकमेवर केली आहे. शासनाकडून बँकांना विविध योजनेतील सवलतीअंतर्गत ७२३ कोटी येणे आहेत. त्यावरही शासनाने व्याज द्यावे, अशी मागणी आहे.