शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

शासन भांडवलदारी दलालांचे पोशिंदे

By admin | Updated: February 24, 2017 23:46 IST

नरसय्या आडम : वाळव्यात ‘अरुणभैया नायकवडी पुरस्कारा’ने गौरव

वाळवा : वीस भांडवलदारांचे सात लाख कोटी थकित बॅँक कर्ज माफ होते. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज थकले, तर त्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो. भांडवलदार आणि दलालांचा विकास होऊ लागला आहे. नऊ हजार कोटीचे बॅँक कर्ज बुडवून विजय मल्ल्या रात्रीत परदेशात पळून जातो. परंतु शेतकऱ्याने वीज बिल भरले नाही, तर त्याचे कनेक्शन तोडले जाते. हे शासन दलालांचे पोशिंदे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कामगार नेते कॉ. नरसय्या आडम यांनी वाळवा येथे केले.येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने शुक्रवारी कॉ. आडम यांना ‘अरुणभैया नायकवडी राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार’ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आयोजित स्मृतिदिन सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी होते.व्यासपीठावर भगवान पाटील, जयवंत अहिर, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिराळा पंचायत समिती सदस्य प्रा. बाळासाहेब नायकवडी, जि. प. सदस्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, सपना मोरे, पं. स. सदस्या वैशाली जाधव, उपसरपंच अपर्णा साळुंखे, पं. स. सदस्य आशिष काळे, नीलावती माळी, आरपीआयचे अरुण कांबळे, सरपंच गौरव नायकवडी प्रमुख उपस्थित होते. कॉ. आडम म्हणाले की, शेतकऱ्याला या देशात कधी न्याय मिळणार आहे? कारखानदार, व्यापारी, चारचाकीवाले यांना शासन सवलती देते, मग शेतकऱ्यांनाच का सवलती दिल्या जात नाहीत? शेतकरी एकदा का जर संघटित झाला, तर तुम्ही जागेवर सुध्दा राहणार नाही. शेतकऱ्याला ६५ वर्षांनी पाच हजार रुपये मिळतात, पण आमदाराची पाच वर्षे पूर्ण झाली की, त्याला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळते. त्याच्या पश्चात पत्नीला २५ हजार रुपये मिळतात, तिच्यानंतर मुला-मुलींना पेन्शन मिळते. त्यांची अखंड पिढीच्या पिढी सरकारी पैशावरच पोसली जाते. परंतु शेतकऱ्यांचे काय? राज्यकर्त्यांनो धोरणे बदला, अन्यथा आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सांगितलेल्या मार्गाने जावे लागेल व तुमच्या छाताडावर बसावे लागेल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की, कॉ. आडम यांच्या रस्त्यावरच्या लढाईला नवनवे नेतृत्व दिल्यास निश्चितच यश येईल.हुतात्मा किसन अहिर, नाना पाटील यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अरुणभैया नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पांजली वाहिली. प्रा. राजा माळगी यांनी प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन केले. प्रा. जे. पी. कांबळे, प्रा. हाशिम वलांडकर यांनी सूत्रसंचालनकेले. प्रा. मधुकर वायदंडे यांनी आभार मानले. यावेळी नजीर वलांडकर, व्ही. डी. वाजे, विठ्ठल चौगुले, संजय होरे , गंगाराम सुर्यवंशी, विलास गुरव, शंकर जाधव, बी. टी. थोरात, बबन हवलदार, दिलीप पाटील, यशवंत बाबर, बाळासाहेब पाटील, अजित वाजे उपस्थित होते. (वार्ताहर)विडी कामगारांच्या मुलांसाठी एक लाखकॉ. नरसय्या आडम यांनी पुरस्काराच्या २५ हजाराच्या रकमेत स्वत:च्या आमदार पेन्शनमधून मिळणारे ७५ हजार रुपये घालून एक लाख रुपये सोलापूरच्या विडी कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देत आहे, असे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.