शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

शासन भांडवलदारी दलालांचे पोशिंदे

By admin | Updated: February 24, 2017 23:46 IST

नरसय्या आडम : वाळव्यात ‘अरुणभैया नायकवडी पुरस्कारा’ने गौरव

वाळवा : वीस भांडवलदारांचे सात लाख कोटी थकित बॅँक कर्ज माफ होते. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज थकले, तर त्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो. भांडवलदार आणि दलालांचा विकास होऊ लागला आहे. नऊ हजार कोटीचे बॅँक कर्ज बुडवून विजय मल्ल्या रात्रीत परदेशात पळून जातो. परंतु शेतकऱ्याने वीज बिल भरले नाही, तर त्याचे कनेक्शन तोडले जाते. हे शासन दलालांचे पोशिंदे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कामगार नेते कॉ. नरसय्या आडम यांनी वाळवा येथे केले.येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने शुक्रवारी कॉ. आडम यांना ‘अरुणभैया नायकवडी राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार’ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आयोजित स्मृतिदिन सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी होते.व्यासपीठावर भगवान पाटील, जयवंत अहिर, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिराळा पंचायत समिती सदस्य प्रा. बाळासाहेब नायकवडी, जि. प. सदस्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, सपना मोरे, पं. स. सदस्या वैशाली जाधव, उपसरपंच अपर्णा साळुंखे, पं. स. सदस्य आशिष काळे, नीलावती माळी, आरपीआयचे अरुण कांबळे, सरपंच गौरव नायकवडी प्रमुख उपस्थित होते. कॉ. आडम म्हणाले की, शेतकऱ्याला या देशात कधी न्याय मिळणार आहे? कारखानदार, व्यापारी, चारचाकीवाले यांना शासन सवलती देते, मग शेतकऱ्यांनाच का सवलती दिल्या जात नाहीत? शेतकरी एकदा का जर संघटित झाला, तर तुम्ही जागेवर सुध्दा राहणार नाही. शेतकऱ्याला ६५ वर्षांनी पाच हजार रुपये मिळतात, पण आमदाराची पाच वर्षे पूर्ण झाली की, त्याला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळते. त्याच्या पश्चात पत्नीला २५ हजार रुपये मिळतात, तिच्यानंतर मुला-मुलींना पेन्शन मिळते. त्यांची अखंड पिढीच्या पिढी सरकारी पैशावरच पोसली जाते. परंतु शेतकऱ्यांचे काय? राज्यकर्त्यांनो धोरणे बदला, अन्यथा आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सांगितलेल्या मार्गाने जावे लागेल व तुमच्या छाताडावर बसावे लागेल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की, कॉ. आडम यांच्या रस्त्यावरच्या लढाईला नवनवे नेतृत्व दिल्यास निश्चितच यश येईल.हुतात्मा किसन अहिर, नाना पाटील यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अरुणभैया नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पांजली वाहिली. प्रा. राजा माळगी यांनी प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन केले. प्रा. जे. पी. कांबळे, प्रा. हाशिम वलांडकर यांनी सूत्रसंचालनकेले. प्रा. मधुकर वायदंडे यांनी आभार मानले. यावेळी नजीर वलांडकर, व्ही. डी. वाजे, विठ्ठल चौगुले, संजय होरे , गंगाराम सुर्यवंशी, विलास गुरव, शंकर जाधव, बी. टी. थोरात, बबन हवलदार, दिलीप पाटील, यशवंत बाबर, बाळासाहेब पाटील, अजित वाजे उपस्थित होते. (वार्ताहर)विडी कामगारांच्या मुलांसाठी एक लाखकॉ. नरसय्या आडम यांनी पुरस्काराच्या २५ हजाराच्या रकमेत स्वत:च्या आमदार पेन्शनमधून मिळणारे ७५ हजार रुपये घालून एक लाख रुपये सोलापूरच्या विडी कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देत आहे, असे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.