शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

सांगली जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या ९१ शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाले १.८२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 17:22 IST

सांगली : महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती; पण या योजनेत विमा कंपनीकडून ...

सांगली : महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती; पण या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणे या बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या योजनेत सुधारणा केली आहे. नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी जिल्ह्यातून १५९ प्रस्ताव आले असून, त्यापैकी ९१ मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना एक कोटी ८२ लाख रुपये शासनाने दिले आहेत.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत दिली जाणार आहे. अपघातात दोन अवयव निकामी होऊन शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये, तर एक अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.या याेजनेसाठी जिल्ह्यातून १५९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले असून, त्यापैकी ९१ मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रुपयांचे वाटप केले आहे. सात शेतकऱ्यांचे प्रस्ताव समितीने नाकारले आहेत. ६१ प्रस्ताव कृषी विभागाकडून कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पात्रता काय?

  • ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र
  • नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील एक सदस्य योजनेसाठी अर्ज करू शकतात
  • घेण्यासाठी अर्जदार हा १० ते ७५ या वयोगटातील असावा.

हे अपघात लाभासाठी पात्ररस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश व विंचूदंश, जनावर चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेचा लाभ मिळणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना एप्रिल २०२३ पासून सुरू आहे. या योजनेसाठी १५९ प्रस्ताव आले असून, ९१ प्रस्ताव मान्य करून त्यांच्या कुटुंबीयांना लाभ दिला आहे. उर्वरित प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी