शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या ९१ शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाले १.८२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 17:22 IST

सांगली : महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती; पण या योजनेत विमा कंपनीकडून ...

सांगली : महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती; पण या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणे या बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या योजनेत सुधारणा केली आहे. नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी जिल्ह्यातून १५९ प्रस्ताव आले असून, त्यापैकी ९१ मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना एक कोटी ८२ लाख रुपये शासनाने दिले आहेत.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत दिली जाणार आहे. अपघातात दोन अवयव निकामी होऊन शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये, तर एक अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.या याेजनेसाठी जिल्ह्यातून १५९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले असून, त्यापैकी ९१ मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रुपयांचे वाटप केले आहे. सात शेतकऱ्यांचे प्रस्ताव समितीने नाकारले आहेत. ६१ प्रस्ताव कृषी विभागाकडून कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पात्रता काय?

  • ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र
  • नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील एक सदस्य योजनेसाठी अर्ज करू शकतात
  • घेण्यासाठी अर्जदार हा १० ते ७५ या वयोगटातील असावा.

हे अपघात लाभासाठी पात्ररस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश व विंचूदंश, जनावर चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेचा लाभ मिळणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना एप्रिल २०२३ पासून सुरू आहे. या योजनेसाठी १५९ प्रस्ताव आले असून, ९१ प्रस्ताव मान्य करून त्यांच्या कुटुंबीयांना लाभ दिला आहे. उर्वरित प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी