शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Raju Shetty: राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार, लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:49 IST

पन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले

अशोक पाटीलइस्लामपूर : विविध पक्षांशी घरोबा केल्यानेच शेतकरी चळवळ मागे पडली. आगामी काळात कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही. पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.शेट्टी म्हणाले, सत्तेसाठी आपण राजकारण करणार नाही. चळवळीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमानी संघटनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना बळ आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका संघटनेची असणार आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेषत: सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात मतांच्या घोडेबाजाराचा ट्रेंड आला आहे. यावर शेट्टी म्हणाले, आपण अशा ट्रेंडच्या पाठीमागे लागणार नाही. जन्मत: आमचे रक्त चळवळीचे आहे. चळवळीतून आपण मोठे झालो आहोत. आगामी काळात राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार आहे. यासाठी राज्यातील कार्यकर्त्यांना बळ देणार आहोत. प्रत्येक भागातील स्वाभिमानीचा कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. त्यामुळे आता राजकारणापेक्षा चळवळच आम्हांला महत्त्वाची वाटत आहे.ते म्हणाले, आगामी काळात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षीय उमेदवारांची संख्या कितीही असो, आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच निवडणूक लढविणार आहोत. कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही.एक व्होट एक नोटपन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले. परंतु आगामी लोकसभेला मात्र एक व्होट एक नोट हा स्वाभिमानीचा नारा घेऊनच निवडणुकीत उतरणार. मतदार, शेतकरी राजा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील, असाही विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी