शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

साखरेप्रमाणेच दुधालाही अनुदान द्या-सदाभाऊ खोत : राज्य-केंद्रकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 8:32 PM

अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला आहे. याच धर्तीवर सध्या दुधाच्याबाबतीतही शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी दूध व्यवसायालाही विशेष पॅकेज देऊन अडचणीतून बाहेर

सांगली : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला आहे. याच धर्तीवर सध्या दुधाच्याबाबतीतही शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी दूध व्यवसायालाही विशेष पॅकेज देऊन अडचणीतून बाहेर काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, रासायनिक खते, औषधांच्या बेसुमार वापरामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन, सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. खोत म्हणाले की, सध्या कमी दूध संकलनाचा काळ असतानाही राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. जागतिक बाजारात दूध पावडरीचे भाव कोसळल्यानेच ही अडचण आली आहे. २३० ते २४० रूपयांवर असलेला दर आता १३० ते १४० रूपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.

दूध व्यवसायावरील अडचणी दूर करावयाच्या झाल्यास, साखरेप्रमाणेच दुधासाठीही विशेष पॅकेजची गरज आहे. दूध पावडर निर्यातीस प्रति किलो ४० रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रासायनिक खते व औषधांच्या वापरामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढत असल्याने सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. बंदी असलेल्या कीटकनाशकांच्या तपासणीचे अधिकार तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.‘व्हिलेज, नॉलेज, कॉलेज’ अभियानदरवर्षी कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी शिवारात जाऊन अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करत असतात. मातीचे नमुने, खतांची मात्रा याबाबत हे विद्यार्थी शेतकºयांशी संवाद साधतील. त्यांनी शिक्षण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग ते शेतकºयांना करून देणार आहेत. शेतकºयांच्या नेमक्या अडचणी विद्यार्थ्यांना कळाव्यात यासाठी ‘व्हिलेज, नॉलेज, कॉलेज’ अभियान राज्यभर राबविण्यात येणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली