शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने साज चढवित साहित्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने साज चढवित साहित्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही युसूफ जमादार (वय ७५) यांचे दुधगाव (ता. मिरज, जि. सांगली) येथे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज सोमवारी, दिनांक १ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इलाही यांच्या निधनाने मराठी गझलविश्वातला कोहिनूर हरपल्याची भावना साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे.

इलाही जमादार यांचा जन्म दुधगाव येथे १ मार्च १९४६ रोजी झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलविश्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळविणारे गझलकार म्हणून त्यांना ओळखले जात होते. बरीच वर्षे पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोट्या खोलीत त्यांनी वास्तव्य केले. दोन महिन्यांपूर्वी तोल जाऊन पडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते दुधगाव येथे त्यांच्या मूळ गावी परतले. नातेवाईकांनी त्यांची सुश्रूषा केली. शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इलाही जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या. 'जखमा अशा सुगंधी', 'दोहे इलाहीचे', 'भावनांची वादळे', 'गुफ्तगू' 'सखये' 'अनुराग', 'अनुष्का', 'अभिसारिका', 'माझे मौन' 'मला उमगलेली मीरा' अशा सुमारे २० हून अधिक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. यातील 'जखमा अशा सुगंधी', 'दोहे इलाहीचे' आणि 'भावनांची वादळे' या पुस्तकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. उर्दू व अन्य भाषांमधून अनेक गझलप्रकार त्यांनी मराठीत आणले. काही नव्या गझलप्रकारांची निर्मितीही त्यांनी केली. मराठीसह हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली. त्यांच्या गीतांवर आधारित हिंदी व मराठीत सांगीतिक कार्यक्रम व नृत्यनाटिका आजही सादर केल्या जातात.

महाराष्ट्रातील अनेक शहरांत तसेच महाराष्ट्राबाहेरही 'जखमा अशा सुगंधी' व 'महफिल - ए - इलाही' या नावाने मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम त्यांनी सादर केले. अनेक कविसंमेलने व मुशायरे यात सहभाग घेतला होता.

चौकट

'त्या' भेटीचा योग आलाच नाही

दिवंगत प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी इलाही जमादार यांच्या गझलांवर आधारित 'निशिगंध' या अल्बममधून प्रथमच मराठीत गाणी गायिली होती. या अल्बमचे निर्माते शांतिवन तोडकर व संगीतकार हर्षित अभिराज यांच्यासमोर एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी इलाही जमादारांच्या लेखनाचे कौतुक करून त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती, पण या दोन दिग्गजांच्या भेटीचा योग कधीच जुळला नाही.