शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला पाडण्यासाठी सज्ज व्हा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:18 IST

सांगलीत सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात केंद्र सरकारवर टीका, पोलिसांनाही दिले आव्हान 

सांगली : अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकऱ्यांचेही नुकसान करायचे, असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने या गोष्टी घडताहेत. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले.सांगलीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी पक्षाचे नेते जयसिंग शेंडगे, सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांती सावंत, इम्तियाज सादिक, दिशा पिंकी शेख आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले की, देशात सध्या लोकांच्या नकळत पैसे लुटले जात आहेत. शेतीमालाच्या माध्यमातून लुटीचा नवा फंडा या सरकारने शोधून निवडणूक फंड म्हणून त्याचा वापर सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी टॉमेटोचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यांनी ते कवडीमोल दरात विकून टाकले. त्यानंतर दीडच महिन्यात प्रतिकिलो १४० रुपयांपर्यंत हे दर वाढले. त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा दर पाडण्यात आले. भाववाढीच्या काळात ३५ हजार कोटींची लूट या देशात झाली. हा पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला. यावर प्रतिवाद करायचा असेल तर मी कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहे, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.ते म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांचा सत्ताकाळ लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर लुटण्यासाठी कारणी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्यांना कशाचेही भान नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा कशी आहे, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.

मोदींच्या काळात १४ लाख हिंदू कुटुंबांचे स्थलांतरआंबेडकर म्हणाले की, भारतात १९५० ते २०१४ या ६४ वर्षांच्या काळात ७ हजार ६४४ भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. स्वत:ला हिंदू रक्षणकर्ते समजणाऱ्या मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या कालावधीत १४ लाख भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. ईडीची भीती दाखवून आपली संपत्ती व इभ्रत लुटली जाईल, याची भीती या कुटुंबांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी स्थलांतर केले.सभा बरसला पाऊसप्रकाश आंबेडकर यांचे भाषण सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. तुरळक पावसात भिजतच ते बोलत होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. सभा संपल्यानंतर अल्पावधीतच क्रीडांगणावर मुसळधार पावसामुळे दलदल निर्माण झाली.पोलिसांनी गुन्हा दाखल करावाचव्यासपीठावर अनेक महापुरुषांच्या प्रतिमांसह आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला. टिपू सुलतान जयंतीबाबत मज्जाव करणाऱ्या पोलिसांनी हिंमत असेल तर कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

टॅग्स :SangliसांगलीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरCentral Governmentकेंद्र सरकार