शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला पाडण्यासाठी सज्ज व्हा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:18 IST

सांगलीत सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात केंद्र सरकारवर टीका, पोलिसांनाही दिले आव्हान 

सांगली : अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकऱ्यांचेही नुकसान करायचे, असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने या गोष्टी घडताहेत. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले.सांगलीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी पक्षाचे नेते जयसिंग शेंडगे, सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांती सावंत, इम्तियाज सादिक, दिशा पिंकी शेख आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले की, देशात सध्या लोकांच्या नकळत पैसे लुटले जात आहेत. शेतीमालाच्या माध्यमातून लुटीचा नवा फंडा या सरकारने शोधून निवडणूक फंड म्हणून त्याचा वापर सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी टॉमेटोचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यांनी ते कवडीमोल दरात विकून टाकले. त्यानंतर दीडच महिन्यात प्रतिकिलो १४० रुपयांपर्यंत हे दर वाढले. त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा दर पाडण्यात आले. भाववाढीच्या काळात ३५ हजार कोटींची लूट या देशात झाली. हा पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला. यावर प्रतिवाद करायचा असेल तर मी कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहे, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.ते म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांचा सत्ताकाळ लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर लुटण्यासाठी कारणी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्यांना कशाचेही भान नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा कशी आहे, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.

मोदींच्या काळात १४ लाख हिंदू कुटुंबांचे स्थलांतरआंबेडकर म्हणाले की, भारतात १९५० ते २०१४ या ६४ वर्षांच्या काळात ७ हजार ६४४ भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. स्वत:ला हिंदू रक्षणकर्ते समजणाऱ्या मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या कालावधीत १४ लाख भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. ईडीची भीती दाखवून आपली संपत्ती व इभ्रत लुटली जाईल, याची भीती या कुटुंबांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी स्थलांतर केले.सभा बरसला पाऊसप्रकाश आंबेडकर यांचे भाषण सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. तुरळक पावसात भिजतच ते बोलत होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. सभा संपल्यानंतर अल्पावधीतच क्रीडांगणावर मुसळधार पावसामुळे दलदल निर्माण झाली.पोलिसांनी गुन्हा दाखल करावाचव्यासपीठावर अनेक महापुरुषांच्या प्रतिमांसह आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला. टिपू सुलतान जयंतीबाबत मज्जाव करणाऱ्या पोलिसांनी हिंमत असेल तर कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

टॅग्स :SangliसांगलीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरCentral Governmentकेंद्र सरकार