गावांच्या विकासासाठी भविष्याचा विचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:27+5:302021-01-08T05:27:27+5:30

इस्लामपूर : गावांची वाढ झपाट्याने होत असून त्यातून नवनवीन प्रश्नही समोर येत आहेत. आता गावात विकासकामे करताना पुढील २५-३० ...

Future thinking is essential for the development of villages | गावांच्या विकासासाठी भविष्याचा विचार आवश्यक

गावांच्या विकासासाठी भविष्याचा विचार आवश्यक

इस्लामपूर : गावांची वाढ झपाट्याने होत असून त्यातून नवनवीन प्रश्नही समोर येत आहेत. आता गावात विकासकामे करताना पुढील २५-३० वर्षांचा विचार करून विकासकामे करावी लागतील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले.

साखराळे (ता. वाळवा) येथे ९२ लाख रुपयांच्या सहा रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्या रंजना माने, आनंदराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, या परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या संधीचा लाभ जनतेला करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळा अद्ययावत करीत आहोत. रेशन कार्डाचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅम्प घेतले. जातीचे दाखले व आता जात पडताळणीचे दाखले शाळेत देण्याची व्यवस्था केली आहे. धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वाकुर्डे बुद्रुक २ चे पाणी तालुक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर नवा सभा मंडप बांधून विरंगुळा केंद्रही करू.

सरपंच बाबूराव पाटील यांनी स्वागत केले. शिवाजी डांगे, राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, दिनकर धोंडी पाटील, सुबराव डांगे, आनंदराव दवणे, विश्वास माने, प्रताप पाटील, शैलेंद्र सूर्यवंशी, बळवंत माने, वंदना पाटील, अलका माने, एस. व्ही. पाटील उपस्थित होते. उपसरपंच तजमूल चौगुले यांनी आभार मानले.

फोटो : ०५ इस्लामपूर ३

ओळ : साखराळे (ता. वाळवा) येथे रस्त्याच्या कामाचा प्रारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, रंजना माने, बाबूराव पाटील, तजमूल चौगुले उपस्थित होते.

Web Title: Future thinking is essential for the development of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.