शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

एफआरपी दोन हप्त्यात देण्याच्या हालचाली-:साखर कारखान्यांना हवा केंद्राच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 8:37 PM

साखरेच्या बाजारात मंदी असल्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यात कारखानदारांना अडचणी असल्याने ती दोन टप्प्यात देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बहुतांशी कारखाने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या

ठळक मुद्देशेतकरी संकटात

अशोक डोंबाळे/सांगली : साखरेच्या बाजारात मंदी असल्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यात कारखानदारांना अडचणी असल्याने ती दोन टप्प्यात देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बहुतांशी कारखाने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे शासनाकडून त्यांना मदत होत नसल्याचा आरोप होत आहे. एफआरपी दोन टप्प्यात देण्यासही शासनाने परवानगी दिली नसल्यामुळे शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. कारखानदार आणि शासनाच्या राजकीय कुरघोड्यांत शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.

मागील हंगामात देशात ३२० साखर उत्पादन झाले़ एकट्या महाराष्ट्रात १०७ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा देशात ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११५ लाख टन उत्पादनाचा समावेश असेल. एकूण उठाव लक्षात घेता, १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. यापूर्वी शासनाने निर्यातीच्या योजना दिल्या़ परंतु, केवळ पाच लाख टन साखर निर्यात झाली. यामुळेच ऊस उत्पादक व साखर उद्योगासमोर संकट आल्याचे कारखानदारांचे मत आहे.

यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मदत केली पाहिजे, अशीही कारखानदारांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन समस्या मांडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन मदत करण्याची मागणी केली आहे.

शिवाय एफआरपी दोन हप्त्यात देण्याची कारखानदारांनी विनंती केली आहे. मात्र यावर कोणताच तोडगा निघाला नसल्यामुळे ऊस उत्पादकांची बिले देण्यात अडचणी निर्माण झाल्याचे कारखानदार सांगत आहेत. साखर कारखाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी मदत केली जात नसल्याचा कारखानदारांचा आरोप आहे. या भांडणामध्ये शेतकºयांची दीड महिन्यापासून बिले थकीत आहेत.एकरकमी एफआरपीसाठी शासनाने मदत करावी : अरुण लाडसाखरेचे दर प्रतिक्विंटल २९०० ते ३००० रुपयांपर्यंत आहेत. त्याच्या ८५ टक्के कर्ज बँका कारखान्यांना देत आहेत. तोडणी आणि वाहतूक खर्च, हंगाम सुरु करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आदीचा खर्च वजा करता, कारखान्यांकडे प्रतिक्विंटल १९०० ते २००० रुपये शेतकºयांना देण्यासाठी राहत आहेत. यातून एकरकमी एफआरपी कशी देणार? केंद्र आणि राज्य शासनाने मदत केली तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे. अन्यथा एफआरपी दोन टप्प्यात द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली.कारखानदारांचा ‘८०:१०:१०’चा फॉर्म्युलाजिल्'ातील साखर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम लगेच शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी ठेवली आहे. तसेच उर्वरित २० पैकी १० टक्के जून आणि १० टक्के दिवाळीला देण्याच्या फॉर्मुल्यावर साखर कारखानदारांचे बुधवारी एकमत झाले आहे. पण, कारखानदारांचा हा फॉर्म्युला शेतकरी संघटनांना रूचेल का, हा प्रश्न आहे. त्यादृष्टीने संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच ऊस उत्पादकांना बिल देण्याच्या हालचाली सुरू आहेत.चौकटदोन टप्प्यात द्या, पण पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करा : संजय कोलेशेतकरी अडचणीत सापडला आहे, साखरेचे दर उतरले आहेत, याची कल्पना आहे. परंतु, शेतकºयांच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढत चालला असल्यामुळे कारखानदारांनी दोन टप्प्यात एफआरपी दिली तरी हरकत नाही. पण, तातडीने शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग केले पाहिजेत. उर्वरित एफआरपीची रक्कमही लगेच जमा केली पाहिजे. साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपीवर काही पैसे देण्याचा शब्दही कारखानदारांनी पाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या संजय कोले यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा