शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत - सुहास बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:25 IST

मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेतर्फे शेतकऱ्यांना ‘आदर्श गोपालक’ पुरस्कार

सांगली : मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव केला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, मुख्य वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, सरदार पाटील, भगवान वाघमारे, नीलम सकटे, मंदाकिनी करांडे, राजश्री एटम, आशा झिमूर आदी यावेळी उपस्थित होते.

बाबर म्हणाले, मुक्त संचार गोठा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे. गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्टाईटीस) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते. गार्इंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यास मदत होते. दूध उत्पादन वाढते. सांगली जिल्ह्यातील मुक्त संचार गोठ्याचा यशस्वी प्रयोग राज्यभरात जाण्यास मदत होणार आहे.जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंद्रकांत सुतार यांनी आभार मानले.पुरस्काराचे मानकरी...दत्तात्रय पाटील (माधवनगर, ता. मिरज), जयंती चव्हाण (समडोळी, ता. मिरज), राजाराम दबडे (सराटी, ता. कवठेमहांकाळ), उमेश चव्हाण (रांजणी, ता. कवठेमहांकाळ), शशिकांत नाईक (शेगाव, ता. जत) ज्ञानेश्वर माळी (बाज, ता. जत), सुब्राव दबडे (करगणी, ता. आटपाडी), सुरेश सावंत (पळसखेळ, ता. आटपाडी), उत्तम साळुंके (बलवडी-भाळवणी, ता. खानापूर ), धनश्री जाधव (जाधवनगर, ता. खानापूर), जयश्री गिरी (बस्तवडे, ता. तासगाव), बबन पवार (मणेराजुरी, ता. तासगाव), प्रकाश शेटे (ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा), पवन फार्णे (शिगाव, ता. वाळवा), प्रशांत पाटील (कापरी, ता. शिराळा), बाजीराव पाटील (बिळाशी, ता. शिराळा), जयश्री पाटील (बुर्ली, ता. पलूस), सुनील पाटील (भिलवडी, ता. पलूस ), भगवान मुळीक (आसद, ता. कडेगाव), विष्णू पवार (शिवनी, ता. कडेगाव) या शेतकºयांचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद