शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत - सुहास बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:25 IST

मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेतर्फे शेतकऱ्यांना ‘आदर्श गोपालक’ पुरस्कार

सांगली : मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव केला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, मुख्य वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, सरदार पाटील, भगवान वाघमारे, नीलम सकटे, मंदाकिनी करांडे, राजश्री एटम, आशा झिमूर आदी यावेळी उपस्थित होते.

बाबर म्हणाले, मुक्त संचार गोठा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे. गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्टाईटीस) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते. गार्इंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यास मदत होते. दूध उत्पादन वाढते. सांगली जिल्ह्यातील मुक्त संचार गोठ्याचा यशस्वी प्रयोग राज्यभरात जाण्यास मदत होणार आहे.जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंद्रकांत सुतार यांनी आभार मानले.पुरस्काराचे मानकरी...दत्तात्रय पाटील (माधवनगर, ता. मिरज), जयंती चव्हाण (समडोळी, ता. मिरज), राजाराम दबडे (सराटी, ता. कवठेमहांकाळ), उमेश चव्हाण (रांजणी, ता. कवठेमहांकाळ), शशिकांत नाईक (शेगाव, ता. जत) ज्ञानेश्वर माळी (बाज, ता. जत), सुब्राव दबडे (करगणी, ता. आटपाडी), सुरेश सावंत (पळसखेळ, ता. आटपाडी), उत्तम साळुंके (बलवडी-भाळवणी, ता. खानापूर ), धनश्री जाधव (जाधवनगर, ता. खानापूर), जयश्री गिरी (बस्तवडे, ता. तासगाव), बबन पवार (मणेराजुरी, ता. तासगाव), प्रकाश शेटे (ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा), पवन फार्णे (शिगाव, ता. वाळवा), प्रशांत पाटील (कापरी, ता. शिराळा), बाजीराव पाटील (बिळाशी, ता. शिराळा), जयश्री पाटील (बुर्ली, ता. पलूस), सुनील पाटील (भिलवडी, ता. पलूस ), भगवान मुळीक (आसद, ता. कडेगाव), विष्णू पवार (शिवनी, ता. कडेगाव) या शेतकºयांचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद