शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसात उचलला चार हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:42 IST

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार ...

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार हजारहून अधिक टन कचरा उचलला गेला आहे. अजूनही पूरबाधित परिसरात कचऱ्याचे ढीग आहेत. एकेका रस्त्यावर तीन-चारदा स्वच्छता करूनही कचºयाचे ढीग हटता हटेनात. त्यात स्वच्छतेसाठी हजारो हात मदतीला आल्याने काही प्रमाणात का होईना, महापालिकेला दिलासा मिळाला आहे.महापुराच्या विळख्यात शहराचा ६० टक्के भाग सापडला होता. नागरी वस्तीसह व्यापार पेठेलाही पुराचा मोठा फटका बसला. सांगलीत कृष्णेने उच्चांकी ५८ फुटाची पातळी गाठली. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर पुराचा परिणाम झाला. गेल्या रविवारी पुराची पातळी स्थिर झाली, तर सोमवारपासून पूर ओसरण्यास सुरूवात झाली. पहिले दोन दिवस फूट-दोन फुटाने पातळी उतरली. त्यानंतर मात्र वेगाने पुराचे पाणी नदीपात्रात गेले.पुराचे पाणी ओसरलेल्या भागाची महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिकेच्या हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीला मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांसह राज्यातील नगरपालिकांची यंत्रणाही धावली. संत निरंकारी मंडळ, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जनकल्याण समिती, निर्धार फौंडेशन अशा कित्येक सामाजिक संघटनाही स्वच्छतेत सहभागी झाल्या आहेत. हजारो हात स्वच्छतेसाठी सरसावले असले तरी, पुराची व्याप्ती पाहता, स्वच्छतेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. गेल्या काही दिवसांत वखारभाग, शंभरफुटी, पत्रकारनगर, गणेशनगर, मारुती रोड, हरभट रोड, सराफकट्टा, गणपती पेठ, कापडपेठ आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. घरे, दुकानातील भिजलेला, कुजलेला कचरा रस्त्यावर पडला होता. तो उचलण्यात आला. एकेका रस्त्यावर दोन, तीनदा कचरा उचलला तरी, अजूनही कचºयाचे ढीग रस्त्यावर पडतच आहेत. हा सारा कचरा उचलण्यास अजून पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. अजूनही काही पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांकडून घरांची, दुकानांची स्वच्छता सुरू आहे. विशेषत: बेसमेंटमधील दुकानांच्या स्वच्छतेला आता कुठे सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर येऊन पडत आहे. त्याचा ताण यंत्रणेवर येत आहे. गेल्या सात दिवसात चार हजार टनाहून अधिक कचरा उचलला गेला आहे. दररोजच्या कचरा उठावापेक्षा सहापटीने अधिक कचरा उचलला जात आहे.मुंबईकरांना परतीचे वेधमुंबई महापालिकेचे ३५० हून अधिक कर्मचारी व अधिकारी सफाईसाठी सांगलीत आले आहेत. त्यांच्यासोबत अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आहे. मुंबईसोबतच पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महापालिकाही मदतीला धावल्या आहेत. गेले सात दिवस ते सांगलीत कचरा उठाव, स्वच्छता करीत आहेत. मुंबईच्या सफाई कामगारांना आता परतीचे वेध लागले आहेत. ते परत गेल्यानंतरच खºयाअर्थाने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला आपल्या यंत्रणेचे नियोजन करण्याची गरज आहे. अजून एक अथवा दोन दिवस मुंबईचे कर्मचारी सांगलीत राहतील, असे सांगण्यात येत आहे.