शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सात दिवसात उचलला चार हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:42 IST

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार ...

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार हजारहून अधिक टन कचरा उचलला गेला आहे. अजूनही पूरबाधित परिसरात कचऱ्याचे ढीग आहेत. एकेका रस्त्यावर तीन-चारदा स्वच्छता करूनही कचºयाचे ढीग हटता हटेनात. त्यात स्वच्छतेसाठी हजारो हात मदतीला आल्याने काही प्रमाणात का होईना, महापालिकेला दिलासा मिळाला आहे.महापुराच्या विळख्यात शहराचा ६० टक्के भाग सापडला होता. नागरी वस्तीसह व्यापार पेठेलाही पुराचा मोठा फटका बसला. सांगलीत कृष्णेने उच्चांकी ५८ फुटाची पातळी गाठली. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर पुराचा परिणाम झाला. गेल्या रविवारी पुराची पातळी स्थिर झाली, तर सोमवारपासून पूर ओसरण्यास सुरूवात झाली. पहिले दोन दिवस फूट-दोन फुटाने पातळी उतरली. त्यानंतर मात्र वेगाने पुराचे पाणी नदीपात्रात गेले.पुराचे पाणी ओसरलेल्या भागाची महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिकेच्या हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीला मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांसह राज्यातील नगरपालिकांची यंत्रणाही धावली. संत निरंकारी मंडळ, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जनकल्याण समिती, निर्धार फौंडेशन अशा कित्येक सामाजिक संघटनाही स्वच्छतेत सहभागी झाल्या आहेत. हजारो हात स्वच्छतेसाठी सरसावले असले तरी, पुराची व्याप्ती पाहता, स्वच्छतेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. गेल्या काही दिवसांत वखारभाग, शंभरफुटी, पत्रकारनगर, गणेशनगर, मारुती रोड, हरभट रोड, सराफकट्टा, गणपती पेठ, कापडपेठ आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. घरे, दुकानातील भिजलेला, कुजलेला कचरा रस्त्यावर पडला होता. तो उचलण्यात आला. एकेका रस्त्यावर दोन, तीनदा कचरा उचलला तरी, अजूनही कचºयाचे ढीग रस्त्यावर पडतच आहेत. हा सारा कचरा उचलण्यास अजून पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. अजूनही काही पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांकडून घरांची, दुकानांची स्वच्छता सुरू आहे. विशेषत: बेसमेंटमधील दुकानांच्या स्वच्छतेला आता कुठे सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर येऊन पडत आहे. त्याचा ताण यंत्रणेवर येत आहे. गेल्या सात दिवसात चार हजार टनाहून अधिक कचरा उचलला गेला आहे. दररोजच्या कचरा उठावापेक्षा सहापटीने अधिक कचरा उचलला जात आहे.मुंबईकरांना परतीचे वेधमुंबई महापालिकेचे ३५० हून अधिक कर्मचारी व अधिकारी सफाईसाठी सांगलीत आले आहेत. त्यांच्यासोबत अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आहे. मुंबईसोबतच पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महापालिकाही मदतीला धावल्या आहेत. गेले सात दिवस ते सांगलीत कचरा उठाव, स्वच्छता करीत आहेत. मुंबईच्या सफाई कामगारांना आता परतीचे वेध लागले आहेत. ते परत गेल्यानंतरच खºयाअर्थाने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला आपल्या यंत्रणेचे नियोजन करण्याची गरज आहे. अजून एक अथवा दोन दिवस मुंबईचे कर्मचारी सांगलीत राहतील, असे सांगण्यात येत आहे.