शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगलीतील सागरेश्वर अभयारण्यात चार हरणांचा मृत्यू, वन्यजीव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:21 IST

देवराष्ट्रे (जि. सांगली ) : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपणाशेजारी चार हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हरणांचा ...

देवराष्ट्रे (जि. सांगली) : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपणाशेजारी चार हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हरणांचा मृत्यू होऊन काही दिवस उलटल्यानंतर एकाच दिवशी हरणांचे मृतदेह सापडल्याने वन्यजीव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातत्याने होणाऱ्या हरणांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यावर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींतून होत आहे.सागरेश्वर अभयारण्याच्या आसद, मोहिते-वडगाव हद्दीच्या बाजूला चितळ जातीच्या चार हरणांचा मृत्यू झाला आहे. हरणांचा मृत्यू होऊन काही दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सडलेल्या अवस्थेत हरणांचे मृतदेह आढळले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर जाग आली. यानंतर प्रादेशिक वन विभागाच्या कडेगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. प्रादेशिकचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यावर मृतदेह कडेगाव येथे नेण्यात आले.

याबाबत कडेगावचे प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसटवार यांनी सांगितले की, यातील काही हरणांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. त्या हरणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते. हरणांचा मृत्यू कुत्र्याने पाठलाग केल्याने कुंपणाला धडकून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत हरणांच्या शरीराचे शवविच्छेदन करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforestजंगलforest departmentवनविभाग