शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील सागरेश्वर अभयारण्यात चार हरणांचा मृत्यू, वन्यजीव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:21 IST

देवराष्ट्रे (जि. सांगली ) : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपणाशेजारी चार हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हरणांचा ...

देवराष्ट्रे (जि. सांगली) : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपणाशेजारी चार हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हरणांचा मृत्यू होऊन काही दिवस उलटल्यानंतर एकाच दिवशी हरणांचे मृतदेह सापडल्याने वन्यजीव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातत्याने होणाऱ्या हरणांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यावर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींतून होत आहे.सागरेश्वर अभयारण्याच्या आसद, मोहिते-वडगाव हद्दीच्या बाजूला चितळ जातीच्या चार हरणांचा मृत्यू झाला आहे. हरणांचा मृत्यू होऊन काही दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सडलेल्या अवस्थेत हरणांचे मृतदेह आढळले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर जाग आली. यानंतर प्रादेशिक वन विभागाच्या कडेगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. प्रादेशिकचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यावर मृतदेह कडेगाव येथे नेण्यात आले.

याबाबत कडेगावचे प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसटवार यांनी सांगितले की, यातील काही हरणांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. त्या हरणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते. हरणांचा मृत्यू कुत्र्याने पाठलाग केल्याने कुंपणाला धडकून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत हरणांच्या शरीराचे शवविच्छेदन करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforestजंगलforest departmentवनविभाग