शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

व्हिलचेअरवरील तरुणीच्या मदतीने पूरग्रस्तांना लढण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:40 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आभाळाएवढ्या संकटात मनोबलावर टिकता येते... आव्हान देऊन त्यावर मातही करता येते... ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आभाळाएवढ्या संकटात मनोबलावर टिकता येते... आव्हान देऊन त्यावर मातही करता येते... केवळ प्रेरणादायी कहाण्या सांगून नव्हे, कृतीतून जगून लोकांसमोर त्या मांडल्या, तर मनोबलाचे संक्रमण होऊन समाज सुदृढ होऊ शकतो. तुंग (ता. मिरज) येथील कविता अशोक पाटील या तरुणीने व्हिलचेअरवरून गावोगावच्या पूरग्रस्तांना दिलेली मदत, खच्ची झालेल्या मनांना लढण्याचे बळ देऊन गेली.यंदाच्या महापुराने भल्या-भल्यांना हादरवून सोडले. उरात धडकी भरवणारा पाऊस आणि समुद्राच्या उधाणलेल्या लाटांसारखी वस्त्यांना कवेत घेणारी नदी आठवली तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. होत्याचे नव्हते झाल्याचा अनुभव हजारो कुटुंबांना आला. ज्यांचे थोडे फार बचावले, तेही मनाने खचले. राज्यभरातून मदतीचे लाखो हात या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले. अनेकांनी आधार दिला. अजूनही हे काम अखंडित सुरू आहे. या सर्व गर्दीत कविता पाटील या दिव्यांग तरुणीने पूरग्रस्तांच्या मनांना सक्षमतेचे दान दिले. महापुरात अडकलेले, पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित झालेले लोक पाहून कविता अस्वस्थ झाली. स्वत: दिव्यांग असूनही तिने स्थापन केलेल्या ‘कल्पतरु फाऊंडेशन’मार्फत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार तिने केला. आयुष्याच्या सफरीत पाठीचा भक्कम कणा म्हणून भूमिका बजावलेल्या तिच्या वडिलांनी तिला याकामीही मदत करण्याचे ठरविले आणि त्यांची मदतीची ही गाडी पळू लागली.राज्यभरात कविताचे अनेक दिव्यांग मित्र-मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावरून तिने तिच्या मदतीचा निर्धार सर्वांना सांगितला. दिव्यांग लोकांसह अनेकांनी तिला शक्य तेवढी मदत पाठविली. तिला पदरमोडही करावी लागली. ५ किलो गहू, २ किलो तांदूळ, सॅनिटरी नॅपकिन व अन्य साहित्य असे कीट तयार करून ती एका वाहनातून पूरग्रस्त भागात जात असे आणि त्याठिकाणच्या पूरग्रस्तांना व्हिलचेअरवरून फिरून मदत वाटत असे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला तिचा हा उपक्रम रविवारी पूर्ण झाला.तुंग, आष्टा, कर्नाळ, पद्माळे, सुखवाडी, अंकलखोप, चोरपडेवाडी आदी गावांमध्ये कविताने व्हिलचेअरवरून मदतीचे वाटप केले. तिचा हा खारीचा वाटा पूरग्रस्तांना सर्वात मोठा आधार देऊन गेला. एक दिव्यांग युवती आयुष्यातील मोठ्या संकटाला तोंड देऊन सक्षमपणे उभारून लोकांना सढळ हाताने मदत करीत असल्याचे हे चित्र संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना लढण्याचे बळ देऊन गेले.मैत्रीची अनोखी कहाणीकविता व तिची मैत्रीण अमृता मोरे यांची कहाणीही अनोखी आहे. अमृता ही दिव्यांग नसतानाही तिने आपल्या या मैत्रिणीला कायम साथ दिली. सध्या ती बेंगलोर येथे असली तरी, तिथून ती कविताला प्रत्येक कार्यात प्रोत्साहन व मदत करीत असते. कविता तिला स्वत:चे पाय आणि वडिलांना पाठीचा कणा समजते.असे आले अपंगत्व...आठ महिन्यांची असताना कविताला पाठीत गाठ होती. तिच्यावरील शस्त्रक्रियेवेळी स्पाईन इंज्युरी (पाठीचा कणा जखमी) झाल्याने कमरेपासून खालील भाग संवेदनाहीन झाला. त्यामुळे तिला दिव्यांग म्हणून जगावे लागत आहे. आई, वडील, छोटा भाऊ, एक बहीण असा तिचा परिवार आहे. शिकण्याची जिद्द आणि कुटुंबीयांचे पाठबळ यामुळे तिने एम.ए. बी.एड्.पर्यंतचे शिक्षण घेतले. आता तुंग ग्रामपंचायत सदस्या म्हणून ती कार्यरत आहे.