शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगावच्या राजकीय संघर्षात आटताहेत पाणी योजनांचे पाट, दिखाव्याच्या राजकारणामुळे झाला खेळखंडोबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:54 IST

शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव

दत्ता पाटीलतासगाव : प्रस्थापित नेते आणि त्यांच्या भावी पिढीच्या राजकीय सोयीसाठी तासगाव तालुक्यात श्रेयवादाचा संघर्ष पेटला आहे. नेत्यांच्या दिखाव्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी योजनांचा खेळखंडोबा झाला आहे. या राजकीय संघर्षात तालुक्यातील शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव दिसत आहे.एकेकाळी सधन समजल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्याला गेल्या काही वर्षांत दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. वर्षानुवर्ष पाणी योजनांचे गाजर दाखवून निवडणुका लढवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता श्रेयवादाचे राजकारण सुरू केल्याचे दिसते. तालुक्यात पाणी योजनांचे जाळे विणलेले असले, तरी या योजनांचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. नियोजनाअभावी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या पाणी योजना कुचकामी ठरलेल्या आहेत.

त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत द्राक्ष बागायतदारांवर बागा काढून टाकण्याची वेळ यावर्षी आली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचे चित्र यापेक्षा विदारक आहे. जनतेने पाण्यासाठी टाहो फोडलेला असताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र श्रेयवाद घेण्यासाठी संघर्ष करताहेत.गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात टंचाईची दाहकता आहे. याकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेतृत्वाने सोयीस्कर दुर्लक्ष केले. केवळ निवेदनाचे कागदी घोडे नाचवायचे, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि त्याचा सोशल मीडियावर डांगोरा पिटायचा, असा एककलमी कार्यक्रम तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे.तालुक्यात पाण्यासाठी वाताहात होत असल्याने शेतकरी स्वतःहून रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. अशा परिस्थितीत मिळणाऱ्या पाण्याचे श्रेय लाटण्याचा उद्योग लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.वास्तविक शेतकऱ्यांऐवजी लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरणे अपेक्षित असताना केवळ श्रेयवादाचा ढोल पिटण्यात धन्यता मानली जात आहे. आमदारकी मिळवण्यासाठी केलेल्या कामाच्या श्रेयवादासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) युवा नेत्यात संघर्षाचा खेळ सुरू आहे. यात तालुक्यातील जनतेची मात्र होरपळ होत आहे.

श्रेयवाद नको, पाणी हवेतालुक्यात पाणी योजनांचे जाळे आहे. मात्र, या योजनातून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. या योजना कुचकामी ठरलेल्या आहेत. शेजारील पलूस-कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी रस्त्यावरची लढाई लढून पाणी मिळवले. मात्र, तासगाव तालुक्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या वारसदारांनी रस्त्यावरच्या लढाई ऐवजी, श्रेयवादाचीच लढाई लढण्यास सुरू केली. त्यामुळे पाण्याचा संघर्ष कायम आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीPoliticsराजकारणsumantai patilसुमनताई पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटील