शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कौतुकास्पद! शेकडो वर्षांपासून सांगलीतील पाडळीकरांनी जोपासला धार्मिक सलोखा; मंदिर, मशिदीतही एकजूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 18:09 IST

स्मशानभूमी, दफनभूमी एकाच जागेत; ३५ वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा

दत्ता पाटीलतासगाव : ‘घरापासुनी स्मशान इतुका प्रवास हा होता’ या ओळीप्रमाणेच माणसाचं जगणं. मात्र, या प्रवासात अनेक जाती-धर्मांच्या भिंती उभा करून माणसातील माणूसपण हरवत चालल्याची अनेक उदाहरणे पावला पावलावर दिसतात. याला छेद देत माणुसकी हाच धर्म आचरणात आणून वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणारे गाव म्हणून तासगाव तालुक्यातील पाडळी गावाने एक वेगळी ओळख शेकडो वर्षांपासून जोपासली आहे. वर्षानुवर्षे हिंदू समाजाची स्मशानभूमी आणि मुस्लिम समाजाची दफनभूमी एकाच जागेत आहे. मंदिर, मशिदीच्या उभारणीसाठीदेखील गावाने एकजूट दाखविली आहे.तासगाव तालुक्याच्या उत्तरेच्या टोकाला खानापूर तालुक्याच्या हद्दीलगत डोंगराच्या पायथ्याशी हजार बाराशे लोकसंख्या असलेले पाडली गाव. दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बहुतांश लाेक गलाई व्यवसायानिमित्त देशभरात विखुरलेले आहेत. काही बांधव नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक आहेत.या पाडळीकरांच्या एकजुटीचा प्रवास केवळ घरापुरताच मर्यादित नाही, तर घरापासून स्मशानभूमीपर्यंत हा एकोपा दिसून येतो. बाराशे-पंधराशे लोकवस्तीच्या या गावात सगळ्याच जाती-धर्मासाठी एकच स्मशानभूमी, हे या गावचं वेगळं वैशिष्ट. दहा गुंठे जागेत हिंदू समाजासाठीची स्मशानभूमी आणि मुस्लिम समाजासाठीची दफनभूमी एकाच ठिकाणी आहे. धार्मिक सलोखा जोपासत या गावाने धर्माची भिंत उभी न करता, माणुसकीचे नाते निर्माण करून गुण्यागोविंदाने राहता येते, याची प्रचिती यानिमित्ताने दिली आहे. ही परंपरा इथले गावकरी वर्षानुवर्षे जोपासत आले आहेत.

मंदिर, मशिदीतही एकजूटपाडळीत आठ ते दहा कुटुंब मुस्लिम समाजाची आहेत, तर काही कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून अन्य गावांत स्थायिक झालेली आहेत. मात्र, मंदिर आणि मशीद उभारणीतदेखील गावाने एकजूट ठेवली आहे. आठ-दहा मुस्लिम बांधवांच्या कुटुंबासाठी सगळ्या गावाने एकत्रित येत दहा वर्षांपूर्वी मशिदीची उभारणी केली. सध्या गावात ग्रामदैवताचे मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या कार्यातही मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे खारीचा वाटा उचलून सलोखा जोपासला आहे.

पाडळीने वर्षानुवर्षे सामाजिक, धार्मिक सलोखा जोपासत ठेवलेला आदर्श आमच्यासाठी भूषणावह आहे. हीच परंपरा यापुढेदेखील अशीच अबाधित राहणार आहे. गावात गेल्या ३५ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ या सार्वजनिक उत्सवाची परंपरा निर्माण केली आहे. त्याचा पाडळीकरांना सार्थ अभिमान आहे. - ज्ञानेश्वर पाटील, पोलिस पाटील, पाडळी

टॅग्स :Sangliसांगली