शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

महापूर येतच राहणार, पर्याय शोधावाच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:24 IST

फोटो वापरणे इंट्रो महापुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचे पुनर्वसन करायला हवे, अशी ...

फोटो वापरणे

इंट्रो

महापुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचे पुनर्वसन करायला हवे, अशी सूचना मांडली. आपल्या खात्याच्या गरजेनुसार ते बोलले, पण सांगलीकरांच्या मनात यानिमित्ताने पुनर्वसनाचे बीज पेरले गेले. खरेच शक्य आहे का सांगलीचे पुनर्वसन? बाजारपेठा नव्याने वसवता येतील? मग सध्याच्या सांगलीचे काय? की आहे त्याच स्थितीत कमीत कमी नुकसानीसह महापुरासोबत जगणे शिकावे लागेल? महापुराने निर्माण केलेल्या या प्रश्नांच्या मोहोळावर तज्ज्ञांशी चर्चेअंती मिळालेल्या उत्तरांची मालिका...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात २००५ पासून तीनवेळा थैमान माजविलेल्या महापुराच्या नुकसानीचा एकत्रित आकडा २० हजार कोटींहून अधिक आहे. २०१९ च्या महापुरातील नुकसान तर खूपच होते. नागरिक बेसावध राहिले आणि कृष्णा-वारणेने तडाखा दिला. त्यातून सांगलीकर पुरते सावरण्यापूर्वीच यंदाच्या महापुराचा दणका बसला.

असे महापूर भविष्यातही येत राहणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपाय शोधण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्त सांगलीच्या पुनर्वसनाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. शंभर वर्षांत झाला नाही असा पाऊस झाल्यानेच पूर आला हे सांगून प्रशासन रिकामे होईल, पण तो यानंतरही पुन्हापुन्हा येणार हे तीन महापुरांनी दाखवून दिले आहे. १९१४ मध्ये पहिल्यांदा सांगली पुरात बुडाली, त्यानंतर पटवर्धन संस्थानिकांनी विश्रामगृह, दक्षिण व उत्तर शिवाजीनगरसह अनेक संस्था व वसाहती मूळच्या सांगलीबाहेर वसवल्या, त्याच्या अनुकरणाची वेळ आता पुन्हा आली आहे.

पुनर्वसन करायचेच तर कोठे आणि कोणाचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजवरचा अनुभव पाहता खुद्द प्रशासनानेच सर्व नियम आणि कायदेकानून धाब्यावर बसवत सांगलीचा विस्तार केला आहे. (क्रमश:)

चौकट

नोटिसांचा नैतिक अधिकार महापालिकेने गमावला

अवघ्या ३५ फूट पाणीपातळीला पाण्याखाली जाणाऱ्या शामरावनगर, काकानगर, दत्तनगर या वसाहतींना परवानगी देताना महापालिका प्रशासनाने पुराचा धोका लक्षात घेतला नव्हता काय, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. शामरावनगर तर वर्षातील किमान सहा महिने पाण्यातच असते. पूरपट्ट्यातील हजारो बांधकामे अजूनही सुरुच आहेत. खुद्द आयुक्त बंगलाच जर नदीतील ४५ फूट पाणीपातळीला चोहोबाजूंनी पाण्यात जात असेल, तर अन्य सांगलीकरांना नोटिसा धाडण्याचा अधिकार महापालिकेला उरत नाही.

चौकट

हद्दवाढ हाच तूर्त पर्याय

हद्दवाढ केली नसल्याने सांगलीच्या विस्ताराला मर्यादा आहेत. दक्षिण व पश्चिमेला हातपाय पसरण्याचा प्रयत्न कृष्णा नदीने तीन महापुरांद्वारे हाणून पाडला आहे. पूर्वेला मिरज, कुपवाडकडे जागा शिल्लक नाही. उत्तरेला शेरीनाल्यातून महापूर शहरात घुसतो, त्यामुळे तेथील विस्तारावरही मर्यादा आहेत. या स्थितीत महापालिकेची हद्दवाढ करुन नव्याने शहराचा विस्तार हाच एकमेव मार्ग उरतो. माधवनगर, बुधगाव, कवलापूर, धामणी, बामणोली, सावळीपर्यंतचा विस्तारच महापुरातून सांगलीला वाचवेल.