शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

महापूर येतच राहणार, पर्याय शोधावाच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:24 IST

फोटो वापरणे इंट्रो महापुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचे पुनर्वसन करायला हवे, अशी ...

फोटो वापरणे

इंट्रो

महापुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचे पुनर्वसन करायला हवे, अशी सूचना मांडली. आपल्या खात्याच्या गरजेनुसार ते बोलले, पण सांगलीकरांच्या मनात यानिमित्ताने पुनर्वसनाचे बीज पेरले गेले. खरेच शक्य आहे का सांगलीचे पुनर्वसन? बाजारपेठा नव्याने वसवता येतील? मग सध्याच्या सांगलीचे काय? की आहे त्याच स्थितीत कमीत कमी नुकसानीसह महापुरासोबत जगणे शिकावे लागेल? महापुराने निर्माण केलेल्या या प्रश्नांच्या मोहोळावर तज्ज्ञांशी चर्चेअंती मिळालेल्या उत्तरांची मालिका...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात २००५ पासून तीनवेळा थैमान माजविलेल्या महापुराच्या नुकसानीचा एकत्रित आकडा २० हजार कोटींहून अधिक आहे. २०१९ च्या महापुरातील नुकसान तर खूपच होते. नागरिक बेसावध राहिले आणि कृष्णा-वारणेने तडाखा दिला. त्यातून सांगलीकर पुरते सावरण्यापूर्वीच यंदाच्या महापुराचा दणका बसला.

असे महापूर भविष्यातही येत राहणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपाय शोधण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्त सांगलीच्या पुनर्वसनाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. शंभर वर्षांत झाला नाही असा पाऊस झाल्यानेच पूर आला हे सांगून प्रशासन रिकामे होईल, पण तो यानंतरही पुन्हापुन्हा येणार हे तीन महापुरांनी दाखवून दिले आहे. १९१४ मध्ये पहिल्यांदा सांगली पुरात बुडाली, त्यानंतर पटवर्धन संस्थानिकांनी विश्रामगृह, दक्षिण व उत्तर शिवाजीनगरसह अनेक संस्था व वसाहती मूळच्या सांगलीबाहेर वसवल्या, त्याच्या अनुकरणाची वेळ आता पुन्हा आली आहे.

पुनर्वसन करायचेच तर कोठे आणि कोणाचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजवरचा अनुभव पाहता खुद्द प्रशासनानेच सर्व नियम आणि कायदेकानून धाब्यावर बसवत सांगलीचा विस्तार केला आहे. (क्रमश:)

चौकट

नोटिसांचा नैतिक अधिकार महापालिकेने गमावला

अवघ्या ३५ फूट पाणीपातळीला पाण्याखाली जाणाऱ्या शामरावनगर, काकानगर, दत्तनगर या वसाहतींना परवानगी देताना महापालिका प्रशासनाने पुराचा धोका लक्षात घेतला नव्हता काय, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. शामरावनगर तर वर्षातील किमान सहा महिने पाण्यातच असते. पूरपट्ट्यातील हजारो बांधकामे अजूनही सुरुच आहेत. खुद्द आयुक्त बंगलाच जर नदीतील ४५ फूट पाणीपातळीला चोहोबाजूंनी पाण्यात जात असेल, तर अन्य सांगलीकरांना नोटिसा धाडण्याचा अधिकार महापालिकेला उरत नाही.

चौकट

हद्दवाढ हाच तूर्त पर्याय

हद्दवाढ केली नसल्याने सांगलीच्या विस्ताराला मर्यादा आहेत. दक्षिण व पश्चिमेला हातपाय पसरण्याचा प्रयत्न कृष्णा नदीने तीन महापुरांद्वारे हाणून पाडला आहे. पूर्वेला मिरज, कुपवाडकडे जागा शिल्लक नाही. उत्तरेला शेरीनाल्यातून महापूर शहरात घुसतो, त्यामुळे तेथील विस्तारावरही मर्यादा आहेत. या स्थितीत महापालिकेची हद्दवाढ करुन नव्याने शहराचा विस्तार हाच एकमेव मार्ग उरतो. माधवनगर, बुधगाव, कवलापूर, धामणी, बामणोली, सावळीपर्यंतचा विस्तारच महापुरातून सांगलीला वाचवेल.