शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कृष्णा, वारणेचा पूर ओसरला, सांगली जिल्ह्यातील २६ मार्ग खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:55 IST

वारणेतून पुन्हा विसर्ग घटवला : कोयनेतून विसर्ग वाढविल्याने कृष्णेची पाणीपातळी वाढणार

सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने मंगळवारी दहा हजाराने विसर्ग वाढवून ४२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून पुन्हा विसर्ग कमी करून धरणातून आठ हजार ९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तब्बल पाच दिवसांपासून पाण्याखाली गेलेले २६ मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले. दरम्यान, कृष्णा नदीची पाणीपातळी बुधवारी एक फुटाने वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात ८५.४५ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपासून धरणातून दहा हजाराने क्युसेक विसर्ग वाढविला आहे. धरणातून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण क्षेत्रात ७१ मि.मी. पाऊस झाला आहे. पाऊस कमी असल्यामुळे धरणातील विसर्ग कमी केला आहे. सध्या धरणातून आठ हजार ९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत एक ते दीड फुटाने कमी झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी ३८.०६ फुटांवर आली होती.पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील २४ पूल आणि १२ बंधारे पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यातील ५६ रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यापैकी २६ रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतुकीसाठी मंगळवारी सुरू केले आहेत. अद्यापही २५ रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून सुरू असलेली वाहतूक कायम आहे.

कृष्णेची दोन फुटाने पाणीपातळी वाढणार सध्या नदीची पाणीपातळी ही जरी कमी होत असली तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना व सातारा जिल्ह्यातील इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारी कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी अंदाजे १ ते २ फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकरी यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

धरणातून असा आहे विसर्गधरण - विसर्ग (क्युसेक)कोयना - ४२१००धोम - ४५३कन्हेर - ४६२२उरमोडी - ५००तारळी - ३५२६वारणा - ८०९२

अलमट्टीतून साडेतीन लाखाने विसर्ग होणारअलमट्टी धरणातील पाणीसाठा ६७.८५ टीएमसी झाला असून, तीन लाख दोन हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातून तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. मात्र, आवक वाढत असल्याने कोणत्याही क्षणी तीन लाख ५० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला जाणार आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर