शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

सांगलीत उपनगरांमध्ये पुराचे पाणी शिरले, ६१७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:17 IST

बायपास रस्त्यावर वाहतूककोंडी

सांगली : शहरात पावसाने उसंत घेतली असली तरी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात पाण्याची पातळी १० ते १२ फुटांनी वाढली. शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, दत्तनगर, काकानगर परिसरातील ६० हून अधिक घरात पुराचे पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी व सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आले आहे. कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. पुराचा धोका वाढल्याने नागरिकांच्या स्थलांतरणासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली.शहराचा महापुराचा धोका वाढला आहे. पावसाचा जोर दिवसभरात कमी झाला; पण कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत फुटाफुटाने वाढ होत होती. बुधवारी सकाळी ७ वाजता ३३ फूट पातळी होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत चार फुटांनी वाढ झाली. मध्यरात्रीच सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅटमध्ये पुराचे पाणी शिरले होते. महापालिकेने या परिसरातील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. दत्तनगर, काकानगर परिसरातील घरांना पाण्याने वेढा दिला आहे.सांगली-कर्नाळ रस्ता सकाळीच पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नदीकाठवरील स्वामी समर्थ मंदिर, कृष्णामाई मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरल्याने महापालिकेने कुपवाड येथे अंत्यविधीची व्यवस्था केली. सांगलीवाडीच्या स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे.पुराचा संभाव्य धोका ओळखून महापालिकेने सकाळपासून नागरिकांना स्थलांतर करण्याचा सूचना केल्या. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नीलेश देशमुख यांनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ चौक परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.वाहनतळावरील वाहने स्थलांतराच्या सूचनावखारभाग येथील ट्रक टर्मिनलमधील वाहने तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपायुक्त अश्विनी पाटील यांनी दिल्या. पाटील यांनी सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह वाहनतळाला भेट दिली. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. संभाव्य पूरस्थितीत वाहनांना कोणत्याही धोका होऊ नये, यासाठी वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.

हे रस्ते, वस्त्या पाण्याखालीसूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीसांगली-कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद

बायपास रस्त्यावर वाहतूककोंडीसांगली बायपास रस्त्यावर सकाळपासून वाहतुकीची कोंडी झाली होती. कर्नाळ चौकी रस्ता बंद झाल्याने वाहतुकीचा ताण या रस्त्यावर आला. त्यामुळे सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडीत जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या गाड्या अडकल्या. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाण मांडले होते. वाहतूक शाखेकडून १२ ठिकाणी १८ पोलिस वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत होते.

६१७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविलेकृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, दत्तनगर परिसरात पुराचे पाणी शिरले. या परिसरातील ११३ कुटुंबातील ५६ नागरिकांना महापालिकेने सुरक्षितस्थळी हलविले. काही कुटुंबांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात आसरा घेतला तर काहींनी नातेवाइकांकडे जाणे पसंत केले. दिवसभर पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांची गाठोडे बांधण्यासाठी धावपळ उडाली होती.सूर्यवंशी प्लाॅटमधील २६ कुटुंबातील १४० जणांना रात्रीच स्थलांतरित करण्यात आले. आरवाडे पार्कमधील २६ कुटुंबातील १३८, कर्नाळ रोड, पटवर्धन काॅलनी ५० कुटुंबातील २४४, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभो चौक, दत्तनगर परिसरातील ११ कुटुंबातील ४२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यातील १०२ कुटुंबातील ५२२ नागरिकांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला. तर २२ कुटुंबातील ९३ जण महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.