शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांगलीला पुराचा धोका, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

By अविनाश कोळी | Updated: July 22, 2024 18:08 IST

महापालिकेकडून आवाहन : अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

सांगली : शहरात पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्याने महापालिकेने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृष्णेची पाणीपातळी २५ फुटांवर गेल्याने कधीही स्थलांतर करावे लागेल, अशी सूचना नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आली आहे.सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी गतीने वाढत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत तब्बल आठ फुटाने पाणीपातळी वाढली. रात्रीत वाढलेल्या पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. तीस फुटांवर पाणीपातळी गेल्यानंतर नदीकाठी असलेल्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड वरील शिव मंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी या भागांमधील नागरिकांचे स्थलांतर करावे लागते.त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. बैठकीनंतर अतिरिक्त आयुक्तांनी नदीकाठच्या लोकवस्त्यांची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधून सतर्क राहण्याबाबत सूचना दिली.

महापालिकेची यंत्रणा सज्जसांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आवश्यक त्या सोयी सुविधांसह यंत्रणा सज्ज आहे.

दोन स्वतंत्र पथकेएन. डी. आर. एफ. आणि महापालिका अग्निशमन दल अशी पथके तयार आहेत. अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समनव्याने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

चोवीस तास वॉर रुम कार्यरतआयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत चोवीस तास वॉर रूम कार्यरत असणार आहे. पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनच्या सुचनेचे पालन करावे. त्यांना मदतीची आवश्यता असल्यास वॉर रुमशी संपर्क करावा. अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही यासाठी जाहीर करण्यात ाअले आहेत.

निवारा केंद्रांची सोयप्रशासनाने यापूर्वी पूरग्रस्तांनी सोबत घ्यावयाची महत्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना अत्यावश्यक साहित्य घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfloodपूर