शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Maharashtra Assembly Election 2019 : रणधुमाळीत पूरग्रस्तांचे प्रश्न अधांतरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:03 IST

विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना महापुराच्या संकटाचा सामना करावा लागलेल्या जनतेला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरणधुमाळीत पूरग्रस्तांचे प्रश्न अधांतरीच!विधानसभा निवडणुकीचा बार

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना महापुराच्या संकटाचा सामना करावा लागलेल्या जनतेला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले, छोटे व्यापारी-व्यावसायिकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने सोमवारी काढले. मात्र प्रत्यक्षात व्यापाऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. व्यापाऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. इतरही घटकाला मिळालेली मदत अत्यल्प स्वरूपातील आहे. निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून पूरग्रस्तांच्या प्रश्नांना बगल देण्यात येत आहे.महापुराचा कटू अनुभव पाठीशी घेऊन व कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसूनही पुराचा फटका बसलेल्या भागातील नागरिक पुन्हा नव्याने उभारी घेत आहेत. अशा परिस्थितीतच विधानसभा निवडणुकीचा बार उडाल्याने पूरग्रस्तांच्या प्रश्नावर निवडणुका गाजतील असे चित्र असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक प्रश्नांना बगल देण्यात येत आहे.निवडणुकीमध्ये मदतीसाठी सर्वात प्रथम कोण पोहोचले व काय मदत केली, यावरच चर्चा होताना दिसत आहे. मात्र, पूरग्रस्तांचे मूळ दुखणे असलेल्या भरपाईची रक्कम, अनुदान अद्याप पोहोचलेले नाही.पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण केले व नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनास सादर केला. पूरग्रस्तांना देण्यात येणारा दैनंदिन भत्ता व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात प्रशासनाने चांगली कामगिरी केली असली तरी, त्यानंतरच्या घटकांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

पुरामुळे व्यापाऱ्यांचे ७० ते ८० कोटी रूपयांचे नुकसान झाले. भरपाई देण्याचे आदेश शासनाने सोमवारी काढल्याचे सांगण्यात आले. पूरग्रस्तांच्या सानुग्रह अनुदानातील एक हप्ता थेट बॅँक खात्यात जमा होणार होता.

बॅँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ताही जमा न झाल्याचे चित्र आहे. शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल सादर असला तरी भरपाईबाबत कार्यवाही नाही. सध्या आचारसंहिता लागू असल्यानेही निर्णयात अडचणी येत आहेत.

टॅग्स :sangli-acसांगलीfloodपूरvidhan sabhaविधानसभा