शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

नियुक्त ठिकाणीच प्रांतांकडे निवडणूक जबाबदारी कशी?, सांगलीतील लोकप्रतिनिधींचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:56 IST

पाच विधानसभा मतदारसंघात अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवर प्रश्न

सांगली : नेमणुकीच्या ठिकाणी नियुक्त पाच प्रांताधिकारी यांच्याकडे तेथीलच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जबाबदारी दिली आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांना त्याचा फायदा होऊ शकतो, असाही मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याविरोधात काही लोकप्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबतची लेखी तक्रारही ते राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहेत.निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोग विशेष काळजी घेत आहे. एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली केली आहे. एवढी दक्षता निवडणूक आयोग घेत आहे.पण, प्रांताधिकारी तीन वर्षे नेमणुकीच्या ठिकाणी असतात. या ठिकाणचे आमदार, खासदार यांच्याशी त्यांचा चांगला परिचय असतो. त्यामुळे निवडणुकीचे कामकाज पाहताना तेथील प्रांताधिकारी यांना अडचणी येऊ शकतात. म्हणून नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या प्रांताधिकारी यांच्याकडे तेथीलच विधानसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी देऊ नका, अशी मागणी उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केली आहे.

हे आहेत निवडणूक निर्णय अधिकारीविधानसभा मतदारसंघ - निवडणूक निर्णय अधिकारी

  • इस्लामपूर  - प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन
  • पलूस-कडेगाव - प्रांताधिकारी रंजीत भोसले
  • खानापूर  - प्रांताधिकारी विक्रम बांदल
  • तासगाव-क.महांकाळ - प्रांताधिकारी उत्तम दिघे
  • जत  - प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे

मूळ रहिवासी अधिकाऱ्यांच्या बदल्याएकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले हाेते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एवढी दक्षता निवडणूक आयोग घेत असेल तर नेमणुकीच्या ठिकाणचेच प्रांताधिकारी यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जबाबदारी का सोपवली आहे, असा सवाल काही पक्षांकडून उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुका नि:पक्षपातीपणाने झाल्या पाहिजेत. यासाठी सेवा बजावत असलेल्या प्रांताधिकारी यांच्याकडे तेथीलच विधानसभा निवडणुकीची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी नको आहे. कारण, त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी हितसंबंध निर्माण झालेले असतात. यासाठी शासनाने नेमणुकीच्या ठिकाणचे प्रांताधिकारी यांची अन्य ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. -संजय विभुते, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024