शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागास अडचणींच्या झळा । आयुक्तांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:16 PM

सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे.

ठळक मुद्दे मनुष्यबळाअभावी कसरत, नगरसेवकांचीही उदासीनता

शीतल पाटील ।सांगली : सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. अपुरा मनुष्यबळाच्या आधारावर नागरिकांच्या सुरक्षेची स्वप्ने पाहिली जात आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या विभागाकडे एकाही सत्ताधारी गटाने अथवा आयुक्तांनी फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, त्यावर एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी अशी सर्वसाधारण रचना अग्निशमन दलाची आहे. पण सांगलीचा विचार करता, शासनाच्या आदर्श नियमावलीलाही लाजवेल, अशी स्थिती आहे. सात अग्निशमन बंब, त्यावर काम करणारे ३४ कर्मचारी अशा कमकुवत आधारावर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम या विभागाला करावे लागत आहे. एक अग्निशमन केंद्राकडे एक स्टेशन आॅफिसर, तीन उपअग्निशमन अधिकारी, ३ प्रमुख अग्निशामक विमोचक, ६ वाहन-यंत्रचालक व २१ फायरमन असा ताफा आवश्यक आहे. पण सध्या तीन अधिकारी व ६७ कर्मचाऱ्यांच्या जिवावर सात अग्निशमन केंद्र चालविले जात आहे. एका गाडीमागे सहा कर्मचारी असे गणित घातले, तर एका शिफ्टसाठी किमान ४२ कर्मचाºयांची, तर तीन शिफ्टसाठी १२६ कर्मचाºयांची आवश्यकता आहे. त्यात कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटीचा विचार करता, आणखी २० ते ३० कर्मचाºयांची गरज आहे.अपुरी साधनसामग्रीसुरतमधील आगीनंतर मोठ्या इमारतीत दुर्घटना घडल्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे असलेल्या अपुºया साधनसामग्रीची चर्चा रंगली आहे. सध्या अग्निशमन गाडीवरील शिडीची उंची केवळ दोन मजल्यापर्यंत मर्यादीत आहे. महापालिकेने आता दहा मजल्यापर्यंत बांधकामांना परवानगी सुरू केली आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.कर्मचारी भरती लाल फितीत!महापालिकेत कर्मचारी भरती बंद आहे. अग्निशमन विभागाने मानधनावर कर्मचारी नियुक्त करावेत, यासाठी फाईल तयार करून ती वरिष्ठांच्या टेबलापर्यंत पोहोचविली. पण या फायलीवरील धूळ काही हटलेली नाही. याचदरम्यान आरोग्य, बांधकाम, नगररचना या विभागात मात्र मानधनावरील कर्मचाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे अग्निशमन विभागाबाबतच दुजाभाव कशासाठी? असा प्रश्न पडला आहे.सध्याची स्थिती...1अग्निशमनकडे ना शिपाई ना लिपिक2फायरमनच करतात सारी कामे3मोठ्या इमारतीतील दुर्घटनेशी मुकाबला करण्याची यंत्रणा नाही4सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील केंद्र बंद5मिरज एमआयडीसीतील केंद्र केवळ दिवसाच सुरू, रात्री बंद6अवघे सात अग्निशमन बंब कार्यरतगेल्या अनेक वर्षात येथील कमतरतेबद्दल चर्चा झाली नाही.

 

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त