शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागास अडचणींच्या झळा । आयुक्तांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:17 IST

सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे.

ठळक मुद्दे मनुष्यबळाअभावी कसरत, नगरसेवकांचीही उदासीनता

शीतल पाटील ।सांगली : सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. अपुरा मनुष्यबळाच्या आधारावर नागरिकांच्या सुरक्षेची स्वप्ने पाहिली जात आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या विभागाकडे एकाही सत्ताधारी गटाने अथवा आयुक्तांनी फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, त्यावर एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी अशी सर्वसाधारण रचना अग्निशमन दलाची आहे. पण सांगलीचा विचार करता, शासनाच्या आदर्श नियमावलीलाही लाजवेल, अशी स्थिती आहे. सात अग्निशमन बंब, त्यावर काम करणारे ३४ कर्मचारी अशा कमकुवत आधारावर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम या विभागाला करावे लागत आहे. एक अग्निशमन केंद्राकडे एक स्टेशन आॅफिसर, तीन उपअग्निशमन अधिकारी, ३ प्रमुख अग्निशामक विमोचक, ६ वाहन-यंत्रचालक व २१ फायरमन असा ताफा आवश्यक आहे. पण सध्या तीन अधिकारी व ६७ कर्मचाऱ्यांच्या जिवावर सात अग्निशमन केंद्र चालविले जात आहे. एका गाडीमागे सहा कर्मचारी असे गणित घातले, तर एका शिफ्टसाठी किमान ४२ कर्मचाºयांची, तर तीन शिफ्टसाठी १२६ कर्मचाºयांची आवश्यकता आहे. त्यात कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटीचा विचार करता, आणखी २० ते ३० कर्मचाºयांची गरज आहे.अपुरी साधनसामग्रीसुरतमधील आगीनंतर मोठ्या इमारतीत दुर्घटना घडल्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे असलेल्या अपुºया साधनसामग्रीची चर्चा रंगली आहे. सध्या अग्निशमन गाडीवरील शिडीची उंची केवळ दोन मजल्यापर्यंत मर्यादीत आहे. महापालिकेने आता दहा मजल्यापर्यंत बांधकामांना परवानगी सुरू केली आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.कर्मचारी भरती लाल फितीत!महापालिकेत कर्मचारी भरती बंद आहे. अग्निशमन विभागाने मानधनावर कर्मचारी नियुक्त करावेत, यासाठी फाईल तयार करून ती वरिष्ठांच्या टेबलापर्यंत पोहोचविली. पण या फायलीवरील धूळ काही हटलेली नाही. याचदरम्यान आरोग्य, बांधकाम, नगररचना या विभागात मात्र मानधनावरील कर्मचाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे अग्निशमन विभागाबाबतच दुजाभाव कशासाठी? असा प्रश्न पडला आहे.सध्याची स्थिती...1अग्निशमनकडे ना शिपाई ना लिपिक2फायरमनच करतात सारी कामे3मोठ्या इमारतीतील दुर्घटनेशी मुकाबला करण्याची यंत्रणा नाही4सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील केंद्र बंद5मिरज एमआयडीसीतील केंद्र केवळ दिवसाच सुरू, रात्री बंद6अवघे सात अग्निशमन बंब कार्यरतगेल्या अनेक वर्षात येथील कमतरतेबद्दल चर्चा झाली नाही.

 

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त