शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागास अडचणींच्या झळा । आयुक्तांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:17 IST

सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे.

ठळक मुद्दे मनुष्यबळाअभावी कसरत, नगरसेवकांचीही उदासीनता

शीतल पाटील ।सांगली : सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. अपुरा मनुष्यबळाच्या आधारावर नागरिकांच्या सुरक्षेची स्वप्ने पाहिली जात आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या विभागाकडे एकाही सत्ताधारी गटाने अथवा आयुक्तांनी फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, त्यावर एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी अशी सर्वसाधारण रचना अग्निशमन दलाची आहे. पण सांगलीचा विचार करता, शासनाच्या आदर्श नियमावलीलाही लाजवेल, अशी स्थिती आहे. सात अग्निशमन बंब, त्यावर काम करणारे ३४ कर्मचारी अशा कमकुवत आधारावर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम या विभागाला करावे लागत आहे. एक अग्निशमन केंद्राकडे एक स्टेशन आॅफिसर, तीन उपअग्निशमन अधिकारी, ३ प्रमुख अग्निशामक विमोचक, ६ वाहन-यंत्रचालक व २१ फायरमन असा ताफा आवश्यक आहे. पण सध्या तीन अधिकारी व ६७ कर्मचाऱ्यांच्या जिवावर सात अग्निशमन केंद्र चालविले जात आहे. एका गाडीमागे सहा कर्मचारी असे गणित घातले, तर एका शिफ्टसाठी किमान ४२ कर्मचाºयांची, तर तीन शिफ्टसाठी १२६ कर्मचाºयांची आवश्यकता आहे. त्यात कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटीचा विचार करता, आणखी २० ते ३० कर्मचाºयांची गरज आहे.अपुरी साधनसामग्रीसुरतमधील आगीनंतर मोठ्या इमारतीत दुर्घटना घडल्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे असलेल्या अपुºया साधनसामग्रीची चर्चा रंगली आहे. सध्या अग्निशमन गाडीवरील शिडीची उंची केवळ दोन मजल्यापर्यंत मर्यादीत आहे. महापालिकेने आता दहा मजल्यापर्यंत बांधकामांना परवानगी सुरू केली आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.कर्मचारी भरती लाल फितीत!महापालिकेत कर्मचारी भरती बंद आहे. अग्निशमन विभागाने मानधनावर कर्मचारी नियुक्त करावेत, यासाठी फाईल तयार करून ती वरिष्ठांच्या टेबलापर्यंत पोहोचविली. पण या फायलीवरील धूळ काही हटलेली नाही. याचदरम्यान आरोग्य, बांधकाम, नगररचना या विभागात मात्र मानधनावरील कर्मचाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे अग्निशमन विभागाबाबतच दुजाभाव कशासाठी? असा प्रश्न पडला आहे.सध्याची स्थिती...1अग्निशमनकडे ना शिपाई ना लिपिक2फायरमनच करतात सारी कामे3मोठ्या इमारतीतील दुर्घटनेशी मुकाबला करण्याची यंत्रणा नाही4सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील केंद्र बंद5मिरज एमआयडीसीतील केंद्र केवळ दिवसाच सुरू, रात्री बंद6अवघे सात अग्निशमन बंब कार्यरतगेल्या अनेक वर्षात येथील कमतरतेबद्दल चर्चा झाली नाही.

 

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त