शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

अखेर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ--लोकमतचा दणका

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

जिल्हा बँकेला जाग : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, तालुक्यात समाधान

दरीबडची : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अनागोंदी कारभारामुळे व महसूल विभागाच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील शेतकरी पीक विम्याला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देऊनसुद्धा पीक विम्यापासून वंचित राहिले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या मुदतवाढीचा मुख्य शाखेकडून अध्यादेश आला नाही, असे कारण दाखवून पीक विमा भरून घेतला नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये १९ आॅगस्ट रोजी ‘पीक विम्यापासून शेतकरी वंचितच!’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बॅँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर बॅँकेने दरीबडची येथील शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करून ८ शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेतला आहे. ‘लोकमत’मुळे न्याय मिळाला आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजनेत प्रतिहेक्टर बाजरीसाठी २२४ रुपये, मूगसाठी ३०२ रुपये, भुईमूगसाठी ८३३ बँकेत भरायचे होते. पीक विम्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. शेतकरी व राजकीय नेत्यांनी पीक विम्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. काही भागामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेने सर्व शाखांना पीक विम्याला मुदतवाढ मिळाल्याचे पत्र दिले होते. तसेच १ आॅगस्टनंतर पेरणी झाली आहे, असा तलाठी यांचा दाखला अनिवार्य केला होता. परंतु अनेक गावांमध्ये तलाठ्यांनी दाखला न दिल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता आले नव्हते. मुदतवाढ दिल्यानंतर जालिहाळ खुर्द येथील शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी कागदपत्रांसह गेले असता जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या दरीबडची शाखेने पीक विमा भरून घ्यायला नकार दिला. ‘पीक विम्यापासून शेतकरी वंचितच!’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेतली. त्यानंतर कुशवाह यांनी प्रशासकीय अधिकारी शैलेश कोतमिरे यांना चौकशीचे आदेश दिले. कोतमिरे यांच्याशीही शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर भीमराव माने, सुमन माने, बाळू सूर्यवंशी, तम्मा चव्हाण, वसंत चव्हाण, मनोहर चव्हाण, रामा सूर्यवंशी, भीमा सूर्यवंशी शेतकऱ्यांचा विमा बँकेने भरून घेतला. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीमुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही बॅँकेला दोनवेळा विनंती करून सुद्धा विम्याची रक्कम भरून घेतली नाही. बॅँकेच्या आडमुठेपणामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागले आहे. याची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.- भीमराव माने, वंचित शेतकरी