शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:39 IST

दिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे

आटपाडी : आटपाडी ते दिघंचीदरम्यान महामार्गावर एका मालवाहतूक वाहनाचा फायनान्स कंपनीच्या एजंटांनी कर्ज वसुलीसाठी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग केला. एकेरी मार्गिकेत घुसून तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग करत बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर संबंधित वाहन पकडले. दोन्ही वाहने एकेरी मार्गिकेत घुसल्याने तब्बल तीन ठिकाणी अपघात होता होता टळला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली.गेल्या काही दिवसांपासून आटपाडी व दिघंची परिसरामध्ये चारचाकी व मालवाहतूक वाहनांसाठी फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या वसुली एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. नियम धाब्यावर बसवून कारभार सुरू आहे. महामार्गावरच थांबून आटपाडी ते दिघंची व दिघंची ते पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाते. थकबाकी असलेले वाहन दिसताच चालकास अडवून हफ्त्याबाबत विचारणा केली जाते. मात्र, अनेकदा वाहनचालकाला या अडवणुकीचा अंदाज येत नाही. वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले जाते. अशा वेळी वसुली एजंट त्या वाहनांचा पाठलाग करतात. मात्र पाठलाग करताना महामार्गावरील अन्य वाहनांना अडथळा निर्माण केला जातो.बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आटपाडीहून दिघंचीमार्गे माळशिरसकडे निघालेला एक मालवाहतूक टेम्पो अडवण्याचा प्रयत्न या वसुली एजंटांनी केला. मात्र, चालकास अंदाज न आल्याने त्याने वाहन तसेच पुढे पळवले. यावेळी वसुली एजंटांनीही त्याचा पाठलाग करत आपली माेटार एकेरी मार्गिकेत घुसवली. भरधाव वेगाने फिल्मी स्टाईल तब्बल बारा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यादरम्यान दिघंचीहून आटपाडीकडे येणाऱ्या तीन वाहनांना अपघात हाेता हाेता बचावला.आटपाडी शहरातून सुरू झालेला हा पाठलाग दिघंचीतील पेट्रोल पंपावर थांबला. पेट्रोल पंपासमोर संबंधित एजंटांनी वाहन चालकाला थांबवून दमदाटी सुरू केली. थरारक पाठलाग व वाहनचालकास सुरू असलेली दमदाटी पाहून पेट्रोल पंपावर माेठी गर्दी झाली. संतप्त नागरिक माेटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच-सहा एजंटांवरच धावून गेले. पोलिसात तक्रार करण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एजंटांनी पंपावरून मोटारीसह पळ काढला.

दिघंची परिसरात एजंटांचे ठाणदिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे. हफ्ते थकवलेल्या वाहनांना महामार्गावरच अडवले जाते. काही वेळा संबंधित वाहनाचा धोकादायक पद्धतीने पाठलाग केला जातो. यामुळे महामार्गावरील वाहतूक असुरक्षित बनली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात