शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

पन्नास वर्षांत बारावेळा आला मान्सून उशिरा - : नऊवेळा जून कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:14 IST

मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले.

ठळक मुद्देपुनर्वसूचा ‘बेडूक’च पेरणीला तारण्याची शक्यता; जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

अशोक डोंबाळे ।सांगली : मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरीही पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे, त्याला उशीरच होण्याची शक्यता आहे. पुनर्वसूच्या बेडूक नक्षत्रावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे.

सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात दहा वर्षांपूर्वी साधारणपणे ७ ते १५ जूनच्यादरम्यान मान्सूनची सुरुवात होत असे. वटपौर्णिमेला कृष्णा व वारणा नदीला पूर येत होता. ओढे-नालेही भरलेले असायचे. ८ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर लगेच शेतकºयांची पेरणीची लगबग सुरू होत असे. साधारणपणे २५ जूननंतर पेरण्या होत होत्या. परंतु, मागील दहा वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाच्या आकडेवारीवरून तर ते स्पष्टच झाले आहे.

मागील ५० वर्षांचा आढावा घेता १९९० मध्ये मान्सून ५ जूनला आला होता, तर २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून सर्वात उशिराचा ठरला. तब्बल दहा वर्षे मान्सूनचे आगमन जुलै महिन्यात झाले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे आगमन ५ ते ३० जूनदरम्यान झाले. यंदा हवामान विभागाने सरासरी पावसाचे भाकित केले आहे. प्रत्यक्षात रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागत झालीच नाही. त्यासाठी मृग नक्षत्र उजाडले. मृगाचा पाऊस हलक्या स्वरूपात दोनच दिवस झाला. तोही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पडला नाही. जिथे पाऊस झाला, तेथे मशागतीची लगबग वाढली आहे. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होणार असून, त्याचे वाहन हत्ती असल्यामुळे शेतकºयांना चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाला, तरच खरिपाच्या पेरण्या होणार आहेत.

खरीप पेरणीचा उत्तम कालावधी हा १५ जूनपर्यंतच असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. त्यापुढे म्हणजेच ३० जूनपर्यंत खरीप पेरणी करायची म्हटले तर दोन आठवड्यांचा उशीर होणार आहे. जास्तीत-जास्त शेतकºयांनी १५ जुलैपर्यंतच खरिपाची पेरणी करावी. त्यानंतरचा कालावधी पेरणी आणि त्या पिकासाठी योग्य नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.१५ जुलैनंतर पाऊस चांगला झाला, तर शेतकºयांनी खरीपऐवजी अन्य पिकाची पेरणी करावी अथवा रब्बीची वाट पाहणेच उत्तम आहे. मान्सून लांबल्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.जिल्ह्यात खरीप पेरणी केवळ तीन टक्केचजिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण तीन लाख ४८ हजार ५०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यापैकी दि. १८ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ तीन टक्केच पेरणी झाली आहे.यामध्ये सर्वाधिक शिराळा तालुक्यात २७.९ टक्के पेरणी झाली असून त्यातही भाताच्या धूळवाफ पेरणीचा समावेश आहे. उर्वरित एकाही पिकाची पेरणी झाली नाही.पलूस तालुक्यात ०.६ टक्केवाळवा तालुक्यात ०.५ टक्के पेरणी झाली आहे.यामध्ये नदीच्या पाण्यावर काही शेतकºयांनी सोयाबीनची टोकण केली आहे. उर्वरित सात तालुक्यात एक टक्काही पेरणी झाली नसल्यामुळे दुष्काळाची दाहकता स्पष्ट होत आहे. जून संपत आला तरीही पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.दहा वर्षातील जूनमधील पाऊस (मि.मी.)वर्ष पाऊस२००८ ५९.२२००९ ५७२०१० १६४.४२०११ ८६.७२०१२ ४८२०१३ १०४.३२०१४ ६५२०१५ १२९.१२०१६ १११.४२०१७ ८२.१२०१८ १०५.५जिल्ह्यातील १८ जूनपर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)तालुका जून २०१८ जून २०१९मिरज ५७.५ ८४.६जत २४.४ ६१.७खानापूर १४.६ १०५.२वाळवा ४२.४ ५२.१तासगाव ४६.६ २८.१शिराळा ६२.१ ११०.१आटपाडी ३४ २०.३कवठेमहांकाळ १५.८ ३८.९पलूस ३१.८ ७४.२कडेगाव १८.४ १०६.६सरासरी पाऊस ३६.५ ६८.५

आर्द्रा, पुनर्वसूवरच आता मदार...यंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची मदार आता २२ जूनपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रावरच असल्याचे दिसत आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ६ ते १९ जुलै या कालावधित पुनर्वसू नक्षत्र लागणार असून त्याचे वाहन बेडूक असल्यामुळे, पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार का, अशी चर्चा आहे.

मान्सूनपूर्व पावसाने घेतलेली विश्रांती आणि आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस