शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षांत बारावेळा आला मान्सून उशिरा - : नऊवेळा जून कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:14 IST

मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले.

ठळक मुद्देपुनर्वसूचा ‘बेडूक’च पेरणीला तारण्याची शक्यता; जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

अशोक डोंबाळे ।सांगली : मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरीही पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे, त्याला उशीरच होण्याची शक्यता आहे. पुनर्वसूच्या बेडूक नक्षत्रावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे.

सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात दहा वर्षांपूर्वी साधारणपणे ७ ते १५ जूनच्यादरम्यान मान्सूनची सुरुवात होत असे. वटपौर्णिमेला कृष्णा व वारणा नदीला पूर येत होता. ओढे-नालेही भरलेले असायचे. ८ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर लगेच शेतकºयांची पेरणीची लगबग सुरू होत असे. साधारणपणे २५ जूननंतर पेरण्या होत होत्या. परंतु, मागील दहा वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाच्या आकडेवारीवरून तर ते स्पष्टच झाले आहे.

मागील ५० वर्षांचा आढावा घेता १९९० मध्ये मान्सून ५ जूनला आला होता, तर २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून सर्वात उशिराचा ठरला. तब्बल दहा वर्षे मान्सूनचे आगमन जुलै महिन्यात झाले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे आगमन ५ ते ३० जूनदरम्यान झाले. यंदा हवामान विभागाने सरासरी पावसाचे भाकित केले आहे. प्रत्यक्षात रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागत झालीच नाही. त्यासाठी मृग नक्षत्र उजाडले. मृगाचा पाऊस हलक्या स्वरूपात दोनच दिवस झाला. तोही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पडला नाही. जिथे पाऊस झाला, तेथे मशागतीची लगबग वाढली आहे. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होणार असून, त्याचे वाहन हत्ती असल्यामुळे शेतकºयांना चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाला, तरच खरिपाच्या पेरण्या होणार आहेत.

खरीप पेरणीचा उत्तम कालावधी हा १५ जूनपर्यंतच असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. त्यापुढे म्हणजेच ३० जूनपर्यंत खरीप पेरणी करायची म्हटले तर दोन आठवड्यांचा उशीर होणार आहे. जास्तीत-जास्त शेतकºयांनी १५ जुलैपर्यंतच खरिपाची पेरणी करावी. त्यानंतरचा कालावधी पेरणी आणि त्या पिकासाठी योग्य नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.१५ जुलैनंतर पाऊस चांगला झाला, तर शेतकºयांनी खरीपऐवजी अन्य पिकाची पेरणी करावी अथवा रब्बीची वाट पाहणेच उत्तम आहे. मान्सून लांबल्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.जिल्ह्यात खरीप पेरणी केवळ तीन टक्केचजिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण तीन लाख ४८ हजार ५०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यापैकी दि. १८ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ तीन टक्केच पेरणी झाली आहे.यामध्ये सर्वाधिक शिराळा तालुक्यात २७.९ टक्के पेरणी झाली असून त्यातही भाताच्या धूळवाफ पेरणीचा समावेश आहे. उर्वरित एकाही पिकाची पेरणी झाली नाही.पलूस तालुक्यात ०.६ टक्केवाळवा तालुक्यात ०.५ टक्के पेरणी झाली आहे.यामध्ये नदीच्या पाण्यावर काही शेतकºयांनी सोयाबीनची टोकण केली आहे. उर्वरित सात तालुक्यात एक टक्काही पेरणी झाली नसल्यामुळे दुष्काळाची दाहकता स्पष्ट होत आहे. जून संपत आला तरीही पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.दहा वर्षातील जूनमधील पाऊस (मि.मी.)वर्ष पाऊस२००८ ५९.२२००९ ५७२०१० १६४.४२०११ ८६.७२०१२ ४८२०१३ १०४.३२०१४ ६५२०१५ १२९.१२०१६ १११.४२०१७ ८२.१२०१८ १०५.५जिल्ह्यातील १८ जूनपर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)तालुका जून २०१८ जून २०१९मिरज ५७.५ ८४.६जत २४.४ ६१.७खानापूर १४.६ १०५.२वाळवा ४२.४ ५२.१तासगाव ४६.६ २८.१शिराळा ६२.१ ११०.१आटपाडी ३४ २०.३कवठेमहांकाळ १५.८ ३८.९पलूस ३१.८ ७४.२कडेगाव १८.४ १०६.६सरासरी पाऊस ३६.५ ६८.५

आर्द्रा, पुनर्वसूवरच आता मदार...यंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची मदार आता २२ जूनपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रावरच असल्याचे दिसत आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ६ ते १९ जुलै या कालावधित पुनर्वसू नक्षत्र लागणार असून त्याचे वाहन बेडूक असल्यामुळे, पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार का, अशी चर्चा आहे.

मान्सूनपूर्व पावसाने घेतलेली विश्रांती आणि आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस