शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

क्रीडा स्पर्धांची फी अडीचपटीने वाढली

By admin | Updated: August 14, 2015 00:05 IST

सर्वच वयोगटांतील खेळाडूंच्या फीमध्ये तब्बल अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे.

बाहुबली : सध्या जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरूआहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भराव्या लागणाऱ्या सर्वच वयोगटांतील खेळाडूंच्या फीमध्ये तब्बल अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, शाळा, पालक व प्रशिक्षकांमध्ये फी बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.उदयोन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून सरकारने २0१२ मध्ये क्रीडा धोरण निश्चित केले. त्यानुसार विविध स्तरांवर प्रशासनामार्फत स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे यावर्षी जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रशासनाने फीमध्ये अडीचपट वाढ केलेली आहे.वैयक्तिक क्रीडा प्रकारात मागील वर्षांपर्यंत एका खेळ बाबींसाठी १0 रुपये असलेली फी आता २५ रुपये, तर सांघिक क्रीडा प्रकारांत एका संघाकडून १५ ऐवजी आता ५0 रुपये फी आकारण्यात येत आहे. अशा अधिकच्या फी आकारणीमुळे ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे शालेय स्तरावर खेळाडूंना आवश्यक सुविधा नसताना अशा प्रकारची फी वाढ म्हणजे मुलांना एका प्रकारे स्पर्धांपासून वंचित ठेवल्यासारखेच आहे.राज्य सरकारने २0१२ मध्ये मंजूर केलेल्या क्रीडा धोरणामध्ये तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यापासून ते ग्रामीण भागातील मुलांना विविध क्रीडा प्रकारांत संधी मिळावी यासाठी अनेक सोयीसुविधा पुरविण्याचे निश्चित केले आहे. खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरापर्यंत आयोजन केले जाते. यामध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा, ही अपेक्षा असते. परंतु, यंदाच्या पावसाळी स्पर्धांमध्ये प्रवेश फीमध्ये केलेली वाढ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित ठेवण्यासारखी आहे. याबाबत क्रीडा संघटना, शाळा व पालकांनी एकत्रित येऊन विरोध करणे गरजेचे आहे. जेणेकरून अधिक विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतील. (वार्ताहर)मनमानी कारभारकोल्हापूर शहरातील शाळांकडून या स्पर्धांसाठी नियमित फी शिवाय अधिक फी घेतल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने याबाबत तीव्र विरोध नोंदवून संबंधितांना समज देण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे.कायद्याचे उल्लंघन आरटीई नियमानुसार ६ ते १४ वयोगटांतील मुलांना मोफत शिक्षणाची सोय शासनाने केली असताना १४ वर्षे वयोगटांतील क्रीडा स्पर्धेसाठी फी आकारणे म्हणजे आरटीई कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे या गटातील मुलांना क्रीडा स्पर्धांमध्येदेखील मोफत प्रवेश मिळालाच पाहिजे.