शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 5:30 PM

गेल्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे झालेले निधन, अनेकांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे दोन्ही पक्ष घायाळ झाले आहेत. पटावरचे सर्व मोहरे बदलल्याने आघाडीला आता जुन्या-नव्या चेहऱ्यांना घेऊन जिल्ह्यात क्रमांक एकवर विराजमान झालेल्या भाजप-शिवसेना युतीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.

ठळक मुद्देमहायुतीशी घायाळ आघाडीचा सामनाआठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुका लक्षवेधी ठरणार

अविनाश कोळी सांगली : गेल्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे झालेले निधन, अनेकांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे दोन्ही पक्ष घायाळ झाले आहेत. पटावरचे सर्व मोहरे बदलल्याने आघाडीला आता जुन्या-नव्या चेहऱ्यांना घेऊन जिल्ह्यात क्रमांक एकवर विराजमान झालेल्या भाजप-शिवसेना युतीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.प्रदीर्घकाळ आघाडीचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात भाजप-सेनेने २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली होती. आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून आघाडीला मोठा दणका दिला होता. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने आघाडी आणखीन् कमकुवत झाली. काँग्रेसचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम, मदन पाटील, शिवाजीराव देशमुख, हाफिज धत्तुरे, राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील, विलासराव शिंदे यांच्या निधनाने दोन्ही पक्षांना जबरदस्त धक्का बसला. बहुतांश मतदारसंघांतील सूत्रे आता दुसºया फळीकडे आली आहेत.काँग्रेसमध्ये आ. मोहनराव कदम, सदाशिवराव पाटील आणि राष्ट्रवादीत जयंत पाटील हे दिग्गज नेते ताकदीने उभे आहेत. पतंगरावांच्या पश्चात आ. विश्वजित कदम यांनी मतदारसंघ सांभाळला असला तरी, त्यांच्यासमोर परंपरागत देशमुख घराण्याच्या माध्यमातून भाजपचे आव्हान आहे. त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख मैदानात उतरत आहेत.

आर. आर. पाटील यांच्या पश्चात सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळचा गड राखला असला तरी, सक्षम नेतृत्वाची गरज पक्षाला भासू लागली आहे. तेथे भाजपअंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. खासदार संजयकाका पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटात संघर्ष आहे. संजयकाका पाटील यांच्या पत्नी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.सांगलीत दादा घराण्यातील विशाल पाटील, जयश्री पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसचा गड सांभाळण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी, त्यांना युतीच्या ताकदीसमोर अपयशाला सामोरे जावे लागत आहे. सांगलीतील प्रमुख संस्था आता भाजपकडे गेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनीही या मतदारसंघातील उमेदवारीवर दावा केला आहे. दुसरीकडे मदन पाटील यांचे कार्यकर्ते, जयश्री पाटील यांना मैदानात उतरविण्याची तयारी करीत आहेत. सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून आघाडीसमोर आव्हान आहे.मिरज मतदारसंघात सामाजिक न्याय राज्यमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर उमेदवार निश्चित करताना, आघाडीला कसरत करावी लागेल. हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी, तगडा उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे.खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्यासमोर सदाशिवराव पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचेही आव्हान आहे. आटपाडीतील देशमुख घराण्याची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर उमेदवार कोण, याचा निर्णय आघाडीच्या जागावाटपानंतर होणार आहे. या जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्यायही असणार आहे. सर्वच पक्षांकडे या मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणSangliसांगली