शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:02 IST

'महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही'

कवठेमहांकाळ : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सोमवारी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागला. “या महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. पुन्हा मोजणीला आलात, तर शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील,” असा इशारा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाकलून लावले.गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखालील नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत आहे. या चळवळीचे नेतृत्व भाई दिगंबर कांबळे करीत आहेत. शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-सहा वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवून परत पाठविले आहे. आज पुन्हा आलेल्या पथकाला शेतात प्रवेश नाकारण्यात आला. “रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात आहे, मग समांतर नवीन महामार्गाची काय गरज? हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करून शासन कोणाचा विकास करणार आहे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.यावेळी दिगंबर कांबळे, वामन कदम, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, नागेश कोरे, सौरभ कदम, रत्नाकर वठारे, सुरेश कुंभार, दादा कुंभार, शिवाजी भोसले, संग्राम शिंदे, सागर शिंदे, प्रवीण कोळी, संपत कोळी, बाळू कोळी, शिवाजी कोळी, बाजीराव जाधव, बाळू कदम, दिलीप डुबुले, उल्हास पाटील, शंकर सुतार, किशोर खराडे, अविनाश खराडे, नागेश शिंदे, मनोज जाधव, सुशीला जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी दर्शविला वावरात पाय ठेवण्यास विरोधपूर्वी झालेल्या पंचनाम्यात तहसीलदारांनी बाधीत शेतकऱ्यांची नकारात्मक भूमिका नोंदविली होती आणि “आम्ही पुन्हा मोजणीसाठी येणार नाही,” असे सांगितले होते. मात्र, वारंवार मोजणीसाठी येऊन प्रशासन शेतकऱ्यांना छळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजच्या घटनेवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. तरीदेखील तिसंगीतील सर्व शेतकरी एकजुटीने उभे राहून अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेवू दिला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Halt Highway Survey in Sangli, Threaten Officials

Web Summary : Sangli farmers halted a highway survey, protesting land acquisition for the Nagpur-Goa Shaktipeeth route. They warned officials of resistance if surveying resumed, opposing the project's impact on fertile land. Farmers question the need for a new highway when one already exists.