शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जमाफीतून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:39 IST

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मिळालेल्या कर्जमाफीने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबद्दल राज्य शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनामिरज, पलूस, तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

सांगली : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मिळालेल्या कर्जमाफीने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबद्दल राज्य शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.तासगाव तालुक्यातील तुरची येथील नंदकुमार विठ्ठल पुरके यांचे पुत्र रितेश पुरके म्हणाले, वडिलांनी 2013 साली बँक ऑफ इंडियाचे 3 लाख रुपये कर्ज घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे आम्हाला ते भरता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख, 49 हजार रुपये कर्ज माफ झाले आहे. त्याबद्दल शासनाचे आभारी आहोत.तासगाव येथील सहा एकर शेती असलेले जगन्नाथ कदम म्हणाले, माझी दीड एकर ऊस शेती आणि दीड एकर डाळिंब शेती आहे. मी दहा वर्ष कर्ज घेत आहे. मात्र, नियमितपणे कर्ज फेडल्याबद्दल पहिल्यांदाच मला प्रोत्साहनपर 25 हजार रुपये मिळाले आहेत.पलूस तालुक्यातील खटाव येथील भास्कर विलास साळवी म्हणाले, मी द्राक्षबागेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधून दीड लाख रुपये कर्ज काढले होते. मात्र, दोन चार वर्षे झाली तरी मी ते फेडू शकलो नाही. बाग काढून ऊस लावला. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख, 27 हजार रुपये कर्जमाफी झाली. यातून मला मिळालेली रक्कम मुला-बाळांच्या शिक्षणासाठी खर्च करणार. तसेच, नवीन लागवडीसाठी उपयोग होईल.मिरज तालुक्यातील टाकळीतील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून चवगौंडा आमगौंडा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, टाकळी गावातील 81 लोकांची 58 लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. मी अल्पभूधारक शेतकरी आहे. वैयक्तिक माझी जवळपास 32 हजार रुपयांची कर्जमाफी झाली आहे. मला त्याचा पूर्ण लाभ झाला आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी, शेतीत चांगली लागवड करण्यासाठी याचा मला आधार होणार आहे. त्यामुळे मी राज्य शासनाचा आभारी आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवल्याबद्दल मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे ऋणनिर्देश व्यक्त करून मिरज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संभाजी शिवाप्पा मेंढे म्हणाले, आमच्या सोसायटीचे थकबाकीदार 223 आहेत. त्यातील पहिल्या यादीत 137 थकबाकीदार कर्जमाफीस पात्र झाले आहेत. शासनाने या योजनेमध्ये पारदर्शकेतेने काम केले आहे. त्यामुळे गरजू आणि पात्र लाभार्थींना त्याचा दिलासा मिळणार आहे.मिरज येथे राहणारे आणि ढवळी येथे 3 एकर शेती असलेले श्रीकांत मंगावले यांनी 70 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून संपूर्णपणे माफ झाले आहे. याचा मला आणि माझ्या कुटुंबाला लाभ होणार आहे. त्याबद्दल मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि राज्य शासनाचे ऋणी आहे.मिरज येथील संजय बरगाले यांनी 2013 साली मिरज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतून कर्ज घेतले होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे ते फेडू शकले नव्हते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून माझे संपूर्ण एक लाख 39 हजार रुपये एवढे कर्ज माफ झाले आहे. त्यामुळे मी राज्य शासन आणि बँकेचे आभार मानतो.मिरजच्या माळी गल्ली येथील दत्ता केशव पांगळे म्हणाले, मी 2012 साली मिरज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतून एक लाख, 20 हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, उसाला पाणी मिळाले नसल्यामुळे ते कर्ज थकले होते. मात्र, ते कर्ज शेतकरी सन्मान योजनेतून माफ झाले आहे. याबद्दल मी राज्य शासनाचा आभारी आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर