शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सांगलीत १७ रोजी शेतकरी पेन्शन परिषद : शरद पाटील, शेतकरी संघटनांसह सर्वांना बरोबर घेऊन लढा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 18:01 IST

वृध्द शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी दि. १७ डिसेंबररोजी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शेतकरी पेन्शन परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआमदारांकडून शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठीचे विधेयक

सांगली : वृध्द शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी दि. १७ डिसेंबररोजी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शेतकरी पेन्शन परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, शेतकऱ्याची दहा-वीस एकर शेती असली तरीही त्याला वृध्द झाल्यानंतर फारसे कोणी सन्मानाने सांभाळत नाहीत. या वृध्दांना हक्काने जगता यावे, यासाठी दर महिन्याला किमान दोन हजार रुपये तरी पेन्शन राज्य शासनाने दिली पाहिजे. केरळ, गोवा राज्यात ती मिळत आहे. महाराष्ट्र सरकारनेही शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना ६० वर्षे वयानंतर दर महिन्याला दोन हजार रुपये पेन्शन दिली पाहिजे, या मागणीसाठी जनता दलाचा लढा सुरू आहे.

आता आम्ही निर्णायक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दि. १७ डिसेंबर रोजी सांगलीत शेतकरी पेन्शन परिषद बोलाविली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अशी परिषद घेण्याचे नियोजन आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुंबईत महाराष्ट्रातील ६० हजाराहून अधिक शेतकरी जमा होऊन तीव्र आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा सहभागी होणार आहेत. राज्य सरकारने ठोस निर्णय दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

ते म्हणाले की, डॉ. स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शेतीमालाला उत्पादन खर्चावर दीडपट दर द्यावा, शेतीपंपांना सवलतीच्या दरात चोवीस तास वीजपुरवठा करावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला सरकारी नोकरीत घ्यावे, सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सात-बारा उतारा कोरा करावा आदी मागण्याही आहेत. या आंदोलनात सर्वच शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा आमचा प्रयत्न आहे.आमदारांकडून शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठीचे विधेयकसोलापूर जिल्ह्यातील आमदार अ‍ॅड. रामहरी रुपनवर यांनी शेतकऱ्यांना महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी विधेयक मांडले असून, त्यावर येत्या अधिवेशनात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यावेळी अन्य आमदारांनीही शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते पास करण्यासाठी पाठिंबा देण्याची मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात २२ डिसेंबरला बैठकवृध्दांना मुलगी व मुलगा सांभाळत नसेल तर, त्यांना आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण देखभाल अधिनियम २००७ च्या कायद्याचे तहसीलदार, प्रांताधिकाºयांसह अन्य अधिकाºयांना चांगले ज्ञान मिळावे. जास्तीत-जास्त वृध्दांना न्याय मिळावा, या हेतूनेच जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सर्वच अधिकाºयांची दि. २२ डिसेंबररोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली आहे, असेही प्रा. शरद पाटील यांनी सांगितले.वृध्दांना न्याय देण्यात प्रशासन उदासीन

आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण देखभाल अधिनियम २००७ चा कायदा वृध्दांसाठी दिलासादायक आहे. वृध्दांना मुलगा व मुलगी सांभाळत नसेल तर त्यांच्याविरोधात आई-वडील न्याय मागू शकतात. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील भिलवडी (ता. पलूस), नेलकरंजी (ता. आटपाडी) आणि सांगली शहरातील एक अशा तीन कुटुंबांमधील वृध्दांना त्यांची मुले सांभाळत नाहीत.

याबद्दल आमच्याकडे तक्रार आल्यानंतर संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु, वृध्दांना संरक्षण देणारा कायदाच प्रशासनाला फारसा माहीत नसल्यामुळे वेळेत निकाल लागत नाहीत. तीनही केसमधील वृध्दांना सात ते नऊ हजार दर महिना पोटगी देण्याचा निकाल दिला आहे. पण, त्या निकालावर जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करून मुले आई-वडिलांना पैसे देण्यास नकार देतात, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली