शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Sangli- शक्तिपीठ महामार्ग: ..तर भडका उडेल, महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीने दिला इशारा 

By संतोष भिसे | Updated: March 18, 2024 17:26 IST

हरकती दाखल करण्यास सुरुवात, नदीकाठची गावे वगळण्याची मागणी

सांगली : शक्तिपीठ महामार्ग सक्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडेल. जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा महामार्गविरोधीशेतकरी संघर्ष समितीने दिला. मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मिरजेत प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांकडे सोमवारी मोठ्या संख्येने हरकती दखल केल्या.शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ मार्चरोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार २१ दिवसांत म्हणजे २८ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी झाली. हरकतींमध्ये म्हटले आहे की, आमच्या जगण्याचे एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनींतून महामार्ग गेल्याने आम्ही उध्वस्त होणार आहोत. कुटुंबवाढीमुळे आमच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. महामार्गामुळे अनेक कुटुंबे भूमिहीन होणार आहेत. जमिनींसाठी दडपशाही केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. निवेदन देण्यासाठी समितीचे समन्वयक दिगंबर कांबळे, शरद पवार, घनशाम नलवडे, प्रवीण पाटील, भूषण गुरव, दत्तात्रय बेडगे,  गजानन सावंत, विष्णू सावंत, आनंदा मोरे, वामन कदम, शिवाजी शिंदे, अमर शिंदे, रमेश कांबळे, राहुल जमदाडे, राजेंद्र जमदाडे, सनी करीम, शिवराज पाटील, राहुल खाडे, सुनील कांबळे, प्रशांत कांबळे, प्रदीप इसापुरे, निलेश पाटील आदी उपस्थित होते.

भरपाईत गुंठाभरही जमीन नाहीदिगंबर कांबळे यांनी सांगितले की, जमिनींसाठी गुणांक एकनुसार मोबदला मिळणार आहे. तो अत्यल्प आहे. या पैशांतून अन्यत्र गुंठाभर जमीनही मिळणार नाही. त्यामुळे भूसंपादनास आमची हरकत आहे. खासगी वाटाघाटीने जमिनींचे मूल्यांकन निश्चित करावे. प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये मोबदला मिळावा. औद्योगिक वसाहत व व महापालिका क्षेत्रात किमान चार कोटी रुपये मिळावेत. नदीकाठची पूरबाधित गावे महामार्गातून वगळावीत.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी