शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

जिल्हा बँका विलीन झाल्यास शेतकऱ्यांची फरफट, शेतकरी संघटना म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:42 IST

राज्यातील जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरण करायच्या की त्यांची त्रिस्तरीय रचना कायम ठेवायची याबाबत केंद्र शासनाने अभ्यास गट नियुक्त केला आहे.

सांगली : राज्यातील जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरण करायच्या की त्यांची त्रिस्तरीय रचना कायम ठेवायची याबाबत केंद्र शासनाने अभ्यास गट नियुक्त केला आहे. त्यानंतर सहकार क्षेत्रात यावरील चर्चेने जोर धरला आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातील आजी, माजी पदाधिकारी व तज्ज्ञांच्या मते जिल्हा बँकांचे विलीनीकरण झाल्यास सामान्य शेतकरी व नागरिकांची फरफट होणार आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनांनी यातील राजकीय संचालक मंडळ हटविण्याची मागणी केली आहे.

जिल्हा बँकेतील राजकीय मंडळींना हटविले पाहिजे. जिल्हा बँकांचे विलीनीकरण झाल्यास काहीही तोटा होणार नाही. शेतकऱ्यांना किंवा सोसायट्यांना थेट राज्य बँकांकडून कर्जवितरण झाल्यास व्याजदरही घटेल. यात शेतकऱ्यांचा फायदा आहे.  - महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सध्याच्या त्रिस्तरीय रचनेतून साेसायट्यांना हटवून त्यांचे सभासद जिल्हा बँकेला जोडावेत. जिल्हा बँका व राज्य बँक अशी द्विस्तरीय रचना असावी. जिल्हा बँकेतील राजकीय संचालक मंडळ दूर करून केवळ प्रशासकीय स्तरावर जिल्हा बँकांचे अस्तित्व राहिल्यास शेतकरी व सामान्यांचे हित साधले जाईल. - संजय कोले, राज्यप्रमुख शेतकरी संघटना सहकार आघाडी

प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असते. राज्याच्या एका ठिकाणाहून बसून अन्य जिल्ह्यांबाबत विचार करणे चुकीचे आहे. जिल्हा बँकांमुळे सामान्य शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे या बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. विलीनीकरणाची चर्चा चुकीची आहे. - आ. मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, सांगली जिल्हा बँक

जिल्हा बँकेच्या मुख्य शाखांचे विलीनीकरण केल्यास हरकत नाही, पण सोसायट्या, तालुकास्तरीय बँक व राज्य बँक अशी त्रिस्तरीय रचना करायला हवी. पूर्णत: जिल्हा बँकांचे विलीनीकरण केल्यास तालुकास्तरीय बँकांचे अस्तित्वही संपुष्टात येईल. त्यामुळे कर्जवितरणाची यंत्रणा विस्कळीत होईल. कर्जप्रस्ताव घेऊन मग साेसायट्यांनी जायचे कुठे?  - विलासराव जगताप, माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा बँक

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक