शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:29 IST

उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार

सांगली : गेल्यावर्षी अर्थात डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे दिला होता. या पावसामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली होती. या पिकांची नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडे आली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपये जमा केले आहेत.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. या दरम्यान, ३८४ गावांतील पिके बाधित झाली होती. सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तातडीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण केले.

पंचनामे पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला होता. ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची जिल्ह्यासाठी ३८ कोटी १ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. या निधीपैकी ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

तालुकानिहाय गतवर्षी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई वाटप

तालुका प्राप्त निधी शेतकऱ्यांना वाटप निधी
मिरज९ कोटी ६१ लाख९ कोटी ५६ लाख
तासगाव१३ कोटी १९ लाख१२ कोटी ५७ लाख
वाळवा५ लाख ९२ हजार५ लाख ९० हजार
शिराळा५५ हजार५५ हजार
पलूस३ कोटी ३५ लाख३ कोटी १३ लाख
कडेगाव१ लाख ९१ हजार१ लाख ९१ हजार
खानापूर३ लाख ३० हजार३ लाख ३० हजार
आटपाडी६ लाख ६० हजार६ लाख ३० हजार
कवठेमहांकाळ२ कोटी ८३ लाख२ कोटी ७१ लाख
जत६ कोटी ९६ लाख५ कोटी ७२ लाख
एकूण३८ कोटी १ लाख३५ कोटी २१ लाख
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी