शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:29 IST

उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार

सांगली : गेल्यावर्षी अर्थात डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे दिला होता. या पावसामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली होती. या पिकांची नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडे आली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपये जमा केले आहेत.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. या दरम्यान, ३८४ गावांतील पिके बाधित झाली होती. सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तातडीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण केले.

पंचनामे पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला होता. ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची जिल्ह्यासाठी ३८ कोटी १ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. या निधीपैकी ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

तालुकानिहाय गतवर्षी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई वाटप

तालुका प्राप्त निधी शेतकऱ्यांना वाटप निधी
मिरज९ कोटी ६१ लाख९ कोटी ५६ लाख
तासगाव१३ कोटी १९ लाख१२ कोटी ५७ लाख
वाळवा५ लाख ९२ हजार५ लाख ९० हजार
शिराळा५५ हजार५५ हजार
पलूस३ कोटी ३५ लाख३ कोटी १३ लाख
कडेगाव१ लाख ९१ हजार१ लाख ९१ हजार
खानापूर३ लाख ३० हजार३ लाख ३० हजार
आटपाडी६ लाख ६० हजार६ लाख ३० हजार
कवठेमहांकाळ२ कोटी ८३ लाख२ कोटी ७१ लाख
जत६ कोटी ९६ लाख५ कोटी ७२ लाख
एकूण३८ कोटी १ लाख३५ कोटी २१ लाख
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी