शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

Shaktipeeth Highway: संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीतील शेतकऱ्यांनी पळवून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:41 IST

शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांमध्ये संवादासाठी आलेल्या शेतकऱ्यांना संवाददुतांना शेतकऱ्यांनी पळवून आवले.कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, अंजनी, सावळज, सिद्धेवाडी, गव्हाण, वज्रचौंडी, मणेराजुरी, सावर्डे येथून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या गावांमध्ये शुक्रवारी संवाददुतांमार्फ शेतकऱ्यांशी चर्चा होणार होती. पण, शेतकऱ्यांनी संवाददुतांची भूमिका जाणून घेण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी संवाददूत आणि अधिकाऱ्यांना तेथून पळवून लावले.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख म्हणाले, कोणाचेतरी स्वप्न पूर्ण करण्याकरिता सरकार शक्तिपीठचा घाट घालत आहे. जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकूमशाही प्रवृत्ती चालू देणार नाही. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे.सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही. म्हणून आम्हीही कोणतीही चर्चा करणार नाही. आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील. त्याचा पहिला हिसका शुक्रवारी गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवू, पण महामार्ग होऊ देणार नाही. आमची शेती वाचवू, त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे.यावेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारूगडे, सुनील पवार, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गFarmerशेतकरी