शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:48 IST

मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमाडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी परिसरातील चिंताजनक चित्रनुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

माडग्याळ ,दि.  ०६ :  मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर्व भागातील माडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी आदी भागात कायमस्वरुपी दुष्काळाशी दोनहात करणारे शेतकरी आपले उत्पन्न वाढावे, आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बॅँक, प्रसंगी सावकाराकडून कर्जे काढून बागायत शेतीसाठी प्रयत्न सतत करीत असल्याचे चित्र असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हाता-तोंडाशी आलेली डाळिंब पिके कुजू लागली आहेत. कितीही औषध फवारणी करुनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना कुजलेली डाळिंबे काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सध्या डाळिंबाचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या भागात सुमारे दोन हजाराच्या वर (हेक्टर) डाळिंब क्षेत्र असल्याचे येथील पांडुरंग सावंत या शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले असले तरी, अद्याप या भागातील बागांचे पंचनामे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या भागातील शेतकऱ्यांनी चांगले वातावरण म्हणून जून-जुलै महिन्यात बागांची छाटणी घेतली. आॅगस्ट महिन्यात औषध फवारणी, मशागतीची कामे केली व बहर धरला. नोव्हेंबर महिन्यात फळांची विक्री सुरु होते. मात्र हाता-तोंडाशी आलेल्या डाळिंब बागांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

रात्रंदिवस कष्ट करुन शेतकऱ्यांनी बागा जोमात वाढविल्या. मात्र दर अत्यंत कमी सुरु असल्याने, बागेचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या भागातील नुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संजय निकम या शेतकऱ्यांने केली आहे.

व्यापारी कर्नाटकातून डाळिंबे खरेदी करीत आहेत. येथील डाळिंब खराब असल्याने दर कमी आहे. मात्र कनमडी, अटकेरी, कोहलगी आदी भागात फळे चांगली असल्याने व्यापारी चांगल्या फळांकडे वळला आहे. बिळूर, सोन्याळ, जाडरबोबलाद आदी भागात डाळिंब व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत.

या भागातील पांडुरंग सावंत, सीताराम माळी, दगडू माळी, संजय निकम आदी शेतकऱ्यांच्या बागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते. त्वरित पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे