शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:48 IST

मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमाडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी परिसरातील चिंताजनक चित्रनुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

माडग्याळ ,दि.  ०६ :  मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर्व भागातील माडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी आदी भागात कायमस्वरुपी दुष्काळाशी दोनहात करणारे शेतकरी आपले उत्पन्न वाढावे, आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बॅँक, प्रसंगी सावकाराकडून कर्जे काढून बागायत शेतीसाठी प्रयत्न सतत करीत असल्याचे चित्र असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हाता-तोंडाशी आलेली डाळिंब पिके कुजू लागली आहेत. कितीही औषध फवारणी करुनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना कुजलेली डाळिंबे काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सध्या डाळिंबाचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या भागात सुमारे दोन हजाराच्या वर (हेक्टर) डाळिंब क्षेत्र असल्याचे येथील पांडुरंग सावंत या शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले असले तरी, अद्याप या भागातील बागांचे पंचनामे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या भागातील शेतकऱ्यांनी चांगले वातावरण म्हणून जून-जुलै महिन्यात बागांची छाटणी घेतली. आॅगस्ट महिन्यात औषध फवारणी, मशागतीची कामे केली व बहर धरला. नोव्हेंबर महिन्यात फळांची विक्री सुरु होते. मात्र हाता-तोंडाशी आलेल्या डाळिंब बागांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

रात्रंदिवस कष्ट करुन शेतकऱ्यांनी बागा जोमात वाढविल्या. मात्र दर अत्यंत कमी सुरु असल्याने, बागेचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या भागातील नुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संजय निकम या शेतकऱ्यांने केली आहे.

व्यापारी कर्नाटकातून डाळिंबे खरेदी करीत आहेत. येथील डाळिंब खराब असल्याने दर कमी आहे. मात्र कनमडी, अटकेरी, कोहलगी आदी भागात फळे चांगली असल्याने व्यापारी चांगल्या फळांकडे वळला आहे. बिळूर, सोन्याळ, जाडरबोबलाद आदी भागात डाळिंब व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत.

या भागातील पांडुरंग सावंत, सीताराम माळी, दगडू माळी, संजय निकम आदी शेतकऱ्यांच्या बागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते. त्वरित पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे