शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:48 IST

मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमाडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी परिसरातील चिंताजनक चित्रनुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

माडग्याळ ,दि.  ०६ :  मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर्व भागातील माडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी आदी भागात कायमस्वरुपी दुष्काळाशी दोनहात करणारे शेतकरी आपले उत्पन्न वाढावे, आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बॅँक, प्रसंगी सावकाराकडून कर्जे काढून बागायत शेतीसाठी प्रयत्न सतत करीत असल्याचे चित्र असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हाता-तोंडाशी आलेली डाळिंब पिके कुजू लागली आहेत. कितीही औषध फवारणी करुनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना कुजलेली डाळिंबे काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सध्या डाळिंबाचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या भागात सुमारे दोन हजाराच्या वर (हेक्टर) डाळिंब क्षेत्र असल्याचे येथील पांडुरंग सावंत या शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले असले तरी, अद्याप या भागातील बागांचे पंचनामे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या भागातील शेतकऱ्यांनी चांगले वातावरण म्हणून जून-जुलै महिन्यात बागांची छाटणी घेतली. आॅगस्ट महिन्यात औषध फवारणी, मशागतीची कामे केली व बहर धरला. नोव्हेंबर महिन्यात फळांची विक्री सुरु होते. मात्र हाता-तोंडाशी आलेल्या डाळिंब बागांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

रात्रंदिवस कष्ट करुन शेतकऱ्यांनी बागा जोमात वाढविल्या. मात्र दर अत्यंत कमी सुरु असल्याने, बागेचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या भागातील नुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संजय निकम या शेतकऱ्यांने केली आहे.

व्यापारी कर्नाटकातून डाळिंबे खरेदी करीत आहेत. येथील डाळिंब खराब असल्याने दर कमी आहे. मात्र कनमडी, अटकेरी, कोहलगी आदी भागात फळे चांगली असल्याने व्यापारी चांगल्या फळांकडे वळला आहे. बिळूर, सोन्याळ, जाडरबोबलाद आदी भागात डाळिंब व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत.

या भागातील पांडुरंग सावंत, सीताराम माळी, दगडू माळी, संजय निकम आदी शेतकऱ्यांच्या बागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते. त्वरित पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे