शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना छळू नका; अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार पडळकर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:39 IST

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका.

आटपाडी : राज्यातील ज्या मतदारसंघातील आमदार सत्तेत आहेत, त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडली आहेत. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे शेतकरी हैराण आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना छळू नका. तोडलेली कनेक्शन तत्काळ जोडा, नाहीतर वीज विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

आटपाडी येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माेर्चात माजी मंत्री सदाभाऊ खाेत, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, जयवंत सरगर, राहुल खरात, भाऊसाहेब मेनकुदळे, आदी सहभागी झाले हाेते. यावेळी पडळकर म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी चुकीची बिले दिली आहेत. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांचे कनेक्शन तोडून त्यांना त्रास देऊ नका. शेतकऱ्यांची वीज बिले शंभर टक्के माफ केली पाहिजेत. आमच्याकडे राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या भागातील वीज कनेक्शन जोडल्याची यादी आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, चुकीची बिले देऊन कारवाई करणाऱ्या या विभागाबाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न मांडून धारेवर धरू. आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना आणखी अपमानित करू नका.

आंदाेलनात विष्णू अर्जुन, आप्पासाहेब काळेबाग, बंडोपंत देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

पालकमंत्र्यांचे ऐकून अडचणीत येणार!

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका. तुम्हाला आमदार किंवा मंत्री पगार देत नाहीत. सामान्यांच्या खिशातील करातून पगार मिळतो. मी अजून ३० वर्षे तरी राजकारणात राहीन. खोटे उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुटी देणार नाही. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास विजेच्या खांबावर चढणे आणि उतरणे कठीण करू, असा इशारा पडळकर यांनी दिला.

वीज बिलाचा घोळात घोळ!

आंदोलनात एका शेतकऱ्याने गेल्या महिन्यात २८ हजार रुपये वीज बिल भरले तरी या महिन्यात पुन्हा ३२ हजार रुपये वीज बिल आल्याचे सांगितले. तीन अश्वशक्ती पंपाला पाचचे आणि पाच अश्वशक्ती क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल दहा अश्वशक्तीची बिले दिल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीelectricityवीजGopichand Padalkarगोपीचंद पडळकरmahavitaranमहावितरण