शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतकऱ्यांना छळू नका; अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार पडळकर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:39 IST

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका.

आटपाडी : राज्यातील ज्या मतदारसंघातील आमदार सत्तेत आहेत, त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडली आहेत. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे शेतकरी हैराण आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना छळू नका. तोडलेली कनेक्शन तत्काळ जोडा, नाहीतर वीज विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

आटपाडी येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माेर्चात माजी मंत्री सदाभाऊ खाेत, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, जयवंत सरगर, राहुल खरात, भाऊसाहेब मेनकुदळे, आदी सहभागी झाले हाेते. यावेळी पडळकर म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी चुकीची बिले दिली आहेत. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांचे कनेक्शन तोडून त्यांना त्रास देऊ नका. शेतकऱ्यांची वीज बिले शंभर टक्के माफ केली पाहिजेत. आमच्याकडे राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या भागातील वीज कनेक्शन जोडल्याची यादी आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, चुकीची बिले देऊन कारवाई करणाऱ्या या विभागाबाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न मांडून धारेवर धरू. आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना आणखी अपमानित करू नका.

आंदाेलनात विष्णू अर्जुन, आप्पासाहेब काळेबाग, बंडोपंत देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

पालकमंत्र्यांचे ऐकून अडचणीत येणार!

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका. तुम्हाला आमदार किंवा मंत्री पगार देत नाहीत. सामान्यांच्या खिशातील करातून पगार मिळतो. मी अजून ३० वर्षे तरी राजकारणात राहीन. खोटे उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुटी देणार नाही. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास विजेच्या खांबावर चढणे आणि उतरणे कठीण करू, असा इशारा पडळकर यांनी दिला.

वीज बिलाचा घोळात घोळ!

आंदोलनात एका शेतकऱ्याने गेल्या महिन्यात २८ हजार रुपये वीज बिल भरले तरी या महिन्यात पुन्हा ३२ हजार रुपये वीज बिल आल्याचे सांगितले. तीन अश्वशक्ती पंपाला पाचचे आणि पाच अश्वशक्ती क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल दहा अश्वशक्तीची बिले दिल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीelectricityवीजGopichand Padalkarगोपीचंद पडळकरmahavitaranमहावितरण