शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना छळू नका; अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार पडळकर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:39 IST

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका.

आटपाडी : राज्यातील ज्या मतदारसंघातील आमदार सत्तेत आहेत, त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडली आहेत. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे शेतकरी हैराण आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना छळू नका. तोडलेली कनेक्शन तत्काळ जोडा, नाहीतर वीज विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

आटपाडी येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माेर्चात माजी मंत्री सदाभाऊ खाेत, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, जयवंत सरगर, राहुल खरात, भाऊसाहेब मेनकुदळे, आदी सहभागी झाले हाेते. यावेळी पडळकर म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी चुकीची बिले दिली आहेत. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांचे कनेक्शन तोडून त्यांना त्रास देऊ नका. शेतकऱ्यांची वीज बिले शंभर टक्के माफ केली पाहिजेत. आमच्याकडे राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या भागातील वीज कनेक्शन जोडल्याची यादी आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, चुकीची बिले देऊन कारवाई करणाऱ्या या विभागाबाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न मांडून धारेवर धरू. आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना आणखी अपमानित करू नका.

आंदाेलनात विष्णू अर्जुन, आप्पासाहेब काळेबाग, बंडोपंत देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

पालकमंत्र्यांचे ऐकून अडचणीत येणार!

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका. तुम्हाला आमदार किंवा मंत्री पगार देत नाहीत. सामान्यांच्या खिशातील करातून पगार मिळतो. मी अजून ३० वर्षे तरी राजकारणात राहीन. खोटे उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुटी देणार नाही. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास विजेच्या खांबावर चढणे आणि उतरणे कठीण करू, असा इशारा पडळकर यांनी दिला.

वीज बिलाचा घोळात घोळ!

आंदोलनात एका शेतकऱ्याने गेल्या महिन्यात २८ हजार रुपये वीज बिल भरले तरी या महिन्यात पुन्हा ३२ हजार रुपये वीज बिल आल्याचे सांगितले. तीन अश्वशक्ती पंपाला पाचचे आणि पाच अश्वशक्ती क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल दहा अश्वशक्तीची बिले दिल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीelectricityवीजGopichand Padalkarगोपीचंद पडळकरmahavitaranमहावितरण