शेतकर्‍यास मारहाण; तिघांना सक्तमजुरी

By Admin | Updated: June 5, 2014 00:16 IST2014-06-05T00:16:11+5:302014-06-05T00:16:34+5:30

वकिलासह तिघांना न्यायालयाने सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

Farmer Strikes; Tigers wrestle | शेतकर्‍यास मारहाण; तिघांना सक्तमजुरी

शेतकर्‍यास मारहाण; तिघांना सक्तमजुरी

देवराष्ट्रे : शेतजमिनीच्या वादातून शेतकर्‍याच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी वकिलासह तिघांना कडेगाव न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अ‍ॅड. सचिन उत्तम येताळ, उत्तम रामचंद्र येताळ (दोघेही रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव) व प्रा. डॉ. भरत जाधव (रा. मोहित्यांचे वडगाव) अशी त्यांची नावे आहेत. अ‍ॅड. येताळ व भरत जाधव यांना सहा महिन्यांची सक्तमजुरी, तर मुख्य आरोपी उत्तम येताळ यास एक वर्षाची सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी गावातीलच सिदू निवृत्ती लोहार यांनी फिर्याद दिली होती. उत्तम येताळ यांच्या भावाची जमीन सिदू लोहार यांनी वाट्याने घेतली आहे. यावरून लोहार व उत्तम येताळ याची वादावादी होत असे. १३ डिसेंबर २00८ रोजी याच रागातून उत्तम याने लोहार यांच्या शेतातील गवत व वैरण जबरदस्तीने नेले. त्याचा जाब विचारल्यावर सचिन येताळ, भरत जाधव यांनी त्यांना शिवीगाळ केली. चिंचणी-वांगी पोलिसांत फिर्याद देण्यासाठी जात असलेले सिदू लोहार, त्यांची आई व पत्नीला तिघांनी अंबक हद्दीत मारहाण केली होती.(वार्ताहर)

Web Title: Farmer Strikes; Tigers wrestle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.