शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 18:03 IST

अशोक पाटील इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास ...

अशोक पाटीलइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास आले. आता प्रत्येकाने वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण सुरु केले आहे. परंतु राज्यातील बदलणाऱ्या राजकीय घडामोडीत या नेत्यांची वाताहत होत चालली आहे.महाराष्ट्रात दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. कांदा आंदोलनानंतर जोशी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात राजू शेट्टी (कोल्हापूर), रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील (सांगली) यांनी ऊसदर आंदोलनच्या माध्यमातून शेतकरी संघटनेला उभारी दिली. त्यानंतर जोशीप्रणीत शेतकरी संघटनेत फूट पडली. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नव्याने स्थापना केली. या संघटनेत सदाभाऊ खोत यांना सेनापतीपद देण्यात आले होते.रघुनाथदादा पाटील यांनी शेट्टी यांचे नेतृत्व झुगारत आजअखेर शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर कायम ठेवला. दुसरीकडे सत्तेच्या मोहापायी शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावली. शेट्टी सुरुवातीस भाजपसोबत आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन करून भाजपशी सोबत केली. दोघांनी आपापल्या संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या. स्वतःची वाताहत करून घेतली. आता शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. खोत यांनी भाजपचा अजेंडा रेटण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे.रघुनाथदादा यांनी शेतकरी संघटना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या छत्रछायेखाली नेऊन ठेवली. आगामी काळात शेट्टी व खोत यांच्या संघटनांना शह देण्याच्या प्रयत्नात ते आहेत. या सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला राहिले, आता संघटनेसह त्यांचीही वाताहत सुरू आहे.

शेतकरी संघटनेची वाताहत २००४ पासूनच सुरू आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच लढणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या भूमिकेतून राजकारण करणार आहोत. त्यांच्या आदेशाने आगामी निवडणुका लढविण्याचा विचार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट रोजी पुन्हा राव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणFarmerशेतकरी