शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 18:03 IST

अशोक पाटील इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास ...

अशोक पाटीलइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास आले. आता प्रत्येकाने वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण सुरु केले आहे. परंतु राज्यातील बदलणाऱ्या राजकीय घडामोडीत या नेत्यांची वाताहत होत चालली आहे.महाराष्ट्रात दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. कांदा आंदोलनानंतर जोशी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात राजू शेट्टी (कोल्हापूर), रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील (सांगली) यांनी ऊसदर आंदोलनच्या माध्यमातून शेतकरी संघटनेला उभारी दिली. त्यानंतर जोशीप्रणीत शेतकरी संघटनेत फूट पडली. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नव्याने स्थापना केली. या संघटनेत सदाभाऊ खोत यांना सेनापतीपद देण्यात आले होते.रघुनाथदादा पाटील यांनी शेट्टी यांचे नेतृत्व झुगारत आजअखेर शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर कायम ठेवला. दुसरीकडे सत्तेच्या मोहापायी शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावली. शेट्टी सुरुवातीस भाजपसोबत आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन करून भाजपशी सोबत केली. दोघांनी आपापल्या संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या. स्वतःची वाताहत करून घेतली. आता शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. खोत यांनी भाजपचा अजेंडा रेटण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे.रघुनाथदादा यांनी शेतकरी संघटना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या छत्रछायेखाली नेऊन ठेवली. आगामी काळात शेट्टी व खोत यांच्या संघटनांना शह देण्याच्या प्रयत्नात ते आहेत. या सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला राहिले, आता संघटनेसह त्यांचीही वाताहत सुरू आहे.

शेतकरी संघटनेची वाताहत २००४ पासूनच सुरू आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच लढणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या भूमिकेतून राजकारण करणार आहोत. त्यांच्या आदेशाने आगामी निवडणुका लढविण्याचा विचार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट रोजी पुन्हा राव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणFarmerशेतकरी