शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

आरवडेत शेतक-याने तोडली द्राक्षबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:55 IST

द्राक्षबागेच्या छाटणीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने घड कुजले. सर्व बागेत आलेल्या   दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली. बागेत दलदल निर्माण झाल्यामुळे औषध मारणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे शेतकरी निराश होता. माल नसल्यामुळे यापुढे द्राक्षबाग सांभाळणे अवघड आहे, हे ओळखून या शेतक-याने कु-हाडीने सर्व बागच तोडून टाकली आहे.

ठळक मुद्देद्राक्षबागेच्या छाटणीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने घड कुजले. सर्व बागेत आलेल्या   दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली.

मांजर्डे : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. मागील दोन महिन्यापासून बागेत पाणी साचल्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. झाडावरील सर्वच माल गळून बागच वाया गेल्यामुळे आरवडे (ता. तासगाव) येथील उत्तम दत्तात्रय पाटील यांनी आपली बाग तोडली आहे.

आरवडे येथे उत्तम दत्तात्रय पाटील यांची गोटेवाडी रस्त्याला लोंटबी डोंगरानजीक एक एकर सोनाक्का वाणाची द्राक्षबाग आहे. बागेच्या छाटणीनंतर झाडांवर सरासरी ५० घड आले होते. मागील दोन महिन्यांपासून या भागात सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे बागेत सर्वत्र पाणी साचले होते.

द्राक्षबागेच्या छाटणीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने घड कुजले. सर्व बागेत आलेल्या   दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली. बागेत दलदल निर्माण झाल्यामुळे औषध मारणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे शेतकरी निराश होता. माल नसल्यामुळे यापुढे द्राक्षबाग सांभाळणे अवघड आहे, हे ओळखून या शेतक-याने कु-हाडीने सर्व बागच तोडून टाकली आहे. यामुळे या शेतक-याचे सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. बागेसाठी औषधे, मजुरी, खते यासाठी खर्च केला होता, तो सुद्धा वाया गेला. पाऊस व रोगांमुळे यापुढे आर्थिक नुकसान नको, म्हणून हृदयावर दगड ठेवून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.

दोनच दिवसांपूर्वी मांजर्डे    येथील सुभाष मोहिते या शेतक-याने एक एकर द्राक्षबाग तोडली होती. असेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने या भागातील आणखी   काही शेतकºयांनी आपल्या द्राक्षबागा तोडल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी