शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे बनताहेत मृत्यूचे सापळे, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक

By घनशाम नवाथे | Updated: December 9, 2024 12:36 IST

घनश्याम नवाथे सांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) ...

घनश्याम नवाथेसांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन दिवसांपूर्वी दोघा चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेततळ्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ देताना सुरक्षेच्या उपाययोजनांची खात्री करणे आवश्यक बनले आहे.

पावसाचे पाणी साठवून ठेवून आपत्कालीन परिस्थितीत ते पिकाला देता यावे, यासाठी शेततळ्यांची संकल्पना राबवली जाते. शेततळ्यातून आवश्यक त्यावेळी पिकांना पाणी देता आल्यामुळे अनेकांना ती वरदान ठरली आहेत. परंतु सुरक्षेअभावी शेततळे म्हणजे मृत्यूचे सापळे बनल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी शेततळ्यात बुडून चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत होत आहे. पट्टीचे पोहणारेदेखील शेततळ्यात पडल्यानंतर बुडून मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यंदाच्या वर्षात जोंधळखिंडी येथे निवृत्त शिक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मे महिन्यात नेहरूनगर येथे सुटीला आलेल्या दोघा भावांचा मृत्यू झाला. गतवर्षी २०२३ मध्ये बेडगला दोन भावंडे बुडाली. जून २०२३ मध्ये सोनी येथे पोलिस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला. जतमध्ये मोदीमळा येथे मायलेकाचा मृत्यू झाला. प्रत्येक वर्षी अशा दुर्घटना घडताना दिसतात.शेततळ्यासाठी शासकीय अनुदान मिळते. परंतु शेततळ्याभोवती संरक्षक जाळी बांधणे आवश्यक केले आहे. बरीच शेततळी संरक्षक कुंपणाविना मोकळीच असतात. अनेकांना ती पाहून पोहण्याचा मोह होतो. परंतु आतमध्ये गेल्यानंतर वरती येताना दमछाक होते.प्लास्टिकवरून पाय घसरत असल्यामुळे कसरत करावी लागते. तळ्यात गाळ साचल्यामुळेही अनेकांचा अडकून बुडून मृत्यू होतो. पोहायला न येणाऱ्यांबरोबर पोहता येणाऱ्यांसाठीही शेततळी पाण्यात पडल्यानंतर धोकादायक ठरू शकतात.

जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळी बनवण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत साडेचार हजारहून अधिक शेततळी आहेत. परंतु यापैकी बरीच शेततळी कुंपणाविना आहेत. तेथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर दुर्घटना टळतील

  • शेततळ्यांना कुंपण घातल्यास लहान मुलांना सहजपणे आतमध्ये जाता येणार नाही.
  • शेततळ्यात पडल्यानंतर वरती येताना काठ निसरडे असल्यामुळे घसरल्यासारखे होते. त्यामुळे दोरीच्या शिड्या किंवा जाड दोऱ्या जागोजागी टाकून ठेवाव्यात.
  • पाण्यात सतत ठेवल्यानंतरही खराब न होणारे ‘फ्लोटर’, इनर, थर्माकोल टाकून ठेवावेत.
  • शेततळ्याभोवती सावधानतेचा इशारा देणारे फलक लावावेत.
  • शेततळ्यावर शक्य असल्यास जाळी टाकावी. त्यामुळे कचरा साचला जाईल. जाळी पाहून कोणी उतरणार नाही.

जागृती हवीशेततळे पाहून बऱ्याच जणांना पोहण्याचा मोह होतो. परंतु शेततळ्याची रचनाच वेगळी असते. पट्टीचे पोहणारे आतमध्ये गेल्यानंतर सहजपणे वरती येऊ शकत नाहीत. त्यासाठी शेततळ्यात कोणी जाऊ नये, यासाठी जागृती आवश्यक ठरते. शेतकऱ्यांवर याची मोठी जबाबदारी येते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र