शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

शेततळे बनताहेत मृत्यूचे सापळे, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक

By घनशाम नवाथे | Updated: December 9, 2024 12:36 IST

घनश्याम नवाथे सांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) ...

घनश्याम नवाथेसांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन दिवसांपूर्वी दोघा चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेततळ्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ देताना सुरक्षेच्या उपाययोजनांची खात्री करणे आवश्यक बनले आहे.

पावसाचे पाणी साठवून ठेवून आपत्कालीन परिस्थितीत ते पिकाला देता यावे, यासाठी शेततळ्यांची संकल्पना राबवली जाते. शेततळ्यातून आवश्यक त्यावेळी पिकांना पाणी देता आल्यामुळे अनेकांना ती वरदान ठरली आहेत. परंतु सुरक्षेअभावी शेततळे म्हणजे मृत्यूचे सापळे बनल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी शेततळ्यात बुडून चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत होत आहे. पट्टीचे पोहणारेदेखील शेततळ्यात पडल्यानंतर बुडून मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यंदाच्या वर्षात जोंधळखिंडी येथे निवृत्त शिक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मे महिन्यात नेहरूनगर येथे सुटीला आलेल्या दोघा भावांचा मृत्यू झाला. गतवर्षी २०२३ मध्ये बेडगला दोन भावंडे बुडाली. जून २०२३ मध्ये सोनी येथे पोलिस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला. जतमध्ये मोदीमळा येथे मायलेकाचा मृत्यू झाला. प्रत्येक वर्षी अशा दुर्घटना घडताना दिसतात.शेततळ्यासाठी शासकीय अनुदान मिळते. परंतु शेततळ्याभोवती संरक्षक जाळी बांधणे आवश्यक केले आहे. बरीच शेततळी संरक्षक कुंपणाविना मोकळीच असतात. अनेकांना ती पाहून पोहण्याचा मोह होतो. परंतु आतमध्ये गेल्यानंतर वरती येताना दमछाक होते.प्लास्टिकवरून पाय घसरत असल्यामुळे कसरत करावी लागते. तळ्यात गाळ साचल्यामुळेही अनेकांचा अडकून बुडून मृत्यू होतो. पोहायला न येणाऱ्यांबरोबर पोहता येणाऱ्यांसाठीही शेततळी पाण्यात पडल्यानंतर धोकादायक ठरू शकतात.

जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळी बनवण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत साडेचार हजारहून अधिक शेततळी आहेत. परंतु यापैकी बरीच शेततळी कुंपणाविना आहेत. तेथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर दुर्घटना टळतील

  • शेततळ्यांना कुंपण घातल्यास लहान मुलांना सहजपणे आतमध्ये जाता येणार नाही.
  • शेततळ्यात पडल्यानंतर वरती येताना काठ निसरडे असल्यामुळे घसरल्यासारखे होते. त्यामुळे दोरीच्या शिड्या किंवा जाड दोऱ्या जागोजागी टाकून ठेवाव्यात.
  • पाण्यात सतत ठेवल्यानंतरही खराब न होणारे ‘फ्लोटर’, इनर, थर्माकोल टाकून ठेवावेत.
  • शेततळ्याभोवती सावधानतेचा इशारा देणारे फलक लावावेत.
  • शेततळ्यावर शक्य असल्यास जाळी टाकावी. त्यामुळे कचरा साचला जाईल. जाळी पाहून कोणी उतरणार नाही.

जागृती हवीशेततळे पाहून बऱ्याच जणांना पोहण्याचा मोह होतो. परंतु शेततळ्याची रचनाच वेगळी असते. पट्टीचे पोहणारे आतमध्ये गेल्यानंतर सहजपणे वरती येऊ शकत नाहीत. त्यासाठी शेततळ्यात कोणी जाऊ नये, यासाठी जागृती आवश्यक ठरते. शेतकऱ्यांवर याची मोठी जबाबदारी येते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र