शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

जतच्या स्मशानभूमीत सुविधांची वानवा...

By admin | Updated: March 18, 2015 00:06 IST

पालिकेचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कार करणे जिकिरीचे

जत : येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होत आहेत.जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत जत शहराच्या बाहेर हिंदू स्मशानभूमी आहे. येथे दोन ठिकाणी पत्राशेड आहे. एका पत्राशेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणारी जाळी बसविण्यात आली आहे, पण दुसऱ्या शेडमध्ये जाळी बसविण्यात आलेली नाही. जाळी असल्यामुळे व्यवस्थित लाकडे ठेवून अंत्यसंस्कार करणे सोयीचे होते, तर जाळी नसल्यामुळे लाकडे व्यवस्थित ठेवता येत नाहीत. काहीवेळा मृतदेह अर्धवट जळतात. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता असते. जाळी नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेहाचे पूर्ण दहन होईपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीत बसून रहावे लागत आहे.स्मशानभूमीच्या सभोवताली दगडी संरक्षक भिंत बांधून त्याला मुख्य प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सतत पाणीपुरवठा व लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही भुरटे चोर येथील जाळीची रात्री-अपरात्री चोरी करीत आहेत. तसेच काही उपद्रवी लोक पाण्याची पाईपलाईन फोडून पाणीपुरवठा खंडित करीत आहेत. नगरपालिका प्रशासनाने येथे दिवसभर सुरक्षारक्षक नियुक्त करून भुरटे चोर आणि उपद्रवी नागरिकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रात्री सुरक्षा रक्षक नसल्याने चोरटे रात्री जाळी चोरून नेत होते. नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात जत पोलिसात तक्रारही केली आहे. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.हिंदू स्मशानभूमीच्या समोरच आता नागरी वसाहत तयार झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने येथे पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करून, मृतदेहांची होत असलेली हेळसांड कमी करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)