शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जतच्या स्मशानभूमीत सुविधांची वानवा...

By admin | Updated: March 18, 2015 00:06 IST

पालिकेचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कार करणे जिकिरीचे

जत : येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होत आहेत.जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत जत शहराच्या बाहेर हिंदू स्मशानभूमी आहे. येथे दोन ठिकाणी पत्राशेड आहे. एका पत्राशेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणारी जाळी बसविण्यात आली आहे, पण दुसऱ्या शेडमध्ये जाळी बसविण्यात आलेली नाही. जाळी असल्यामुळे व्यवस्थित लाकडे ठेवून अंत्यसंस्कार करणे सोयीचे होते, तर जाळी नसल्यामुळे लाकडे व्यवस्थित ठेवता येत नाहीत. काहीवेळा मृतदेह अर्धवट जळतात. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता असते. जाळी नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेहाचे पूर्ण दहन होईपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीत बसून रहावे लागत आहे.स्मशानभूमीच्या सभोवताली दगडी संरक्षक भिंत बांधून त्याला मुख्य प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सतत पाणीपुरवठा व लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही भुरटे चोर येथील जाळीची रात्री-अपरात्री चोरी करीत आहेत. तसेच काही उपद्रवी लोक पाण्याची पाईपलाईन फोडून पाणीपुरवठा खंडित करीत आहेत. नगरपालिका प्रशासनाने येथे दिवसभर सुरक्षारक्षक नियुक्त करून भुरटे चोर आणि उपद्रवी नागरिकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रात्री सुरक्षा रक्षक नसल्याने चोरटे रात्री जाळी चोरून नेत होते. नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात जत पोलिसात तक्रारही केली आहे. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.हिंदू स्मशानभूमीच्या समोरच आता नागरी वसाहत तयार झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने येथे पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करून, मृतदेहांची होत असलेली हेळसांड कमी करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)