शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातून निर्यातीला प्रारंभ, आखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:35 IST

सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातून निर्यातीला प्रारंभआखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली. यंदा मात्र तशी स्थिती नाही. लांबलेल्या पावसाने छाटण्या खोळंबून सुमारे २० टक्के बागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षे मुबलक नाहीत. कोरोनावर आरोग्यदायी म्हणून मागणीही चांगली आहे. साहजिकच चांगला दर मिळत आहे.पहिल्याच टप्प्यात दणकेबाज दरसध्या सुपर सोनाकाला चार किलोच्या पेटीला ३५० ते ४१० रुपये दर मिळत आहे. आरके ३७० ते ४२०, अनुष्का ४०० ते ४२०, मिडियम सुपर ३२० ते ३५० असा दणदणीत दर आहे. शरदला चक्क ५५० ते ६०० रुपये मिळत आहे.कटल्याविरोधात बागायतदार आक्रमकनिर्यातीच्या द्राक्षामध्ये ७ टक्के कटला घेतला जातो. म्हणजे एकूण द्राक्षापैकी ७ टक्के खराब म्हणून काढली जातात. घट-तूटीच्या नावाखाली कमी पैसे दिले जातात. याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. निर्यातीच्या बागा व्यापार्याकडे उतरणीसाठी देण्यापूर्वी शेतकरी स्वत:च खराब माल बाजुला काढतात, तरीही प्रत्यक्ष हार्वेस्टींगवेळी पुन्हा ७ टक्के कटला घेतात. अशा व्यापार्यांना हार्वेस्टींग करु देणार नाही अशी शेतकर्यांची भूमिका आहे. हार्वेस्टींग करणारी टोळी प्रत्येक गाडीमागे ५०० ते २००० रुपयांची खुशाली घेते. अशा कंपन्या अथवा व्यापार्यांना माल देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

सात टक्के कटल्यामुळे निर्यातीच्या द्राक्षांना स्थानिक बाजारपेठेचाच दर मिळतो. बागेसाठी लाखो रुपये खर्चानंतरही भुर्दंड सोसावा लागतो.- नागेश कुंभार, बागायतदार, सावळज

घट, तूट आणि चांगल्या मालाच्या नावाखाली कटला घेतला जातो. यामुळे शेतकर्याची थेट लूट होते. निर्यातीसाठी जीवापाड जपलेल्या बागेतील मालाची नासाडी होते.- अनिल माळी, बागायतदार, सावळज

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली