शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे : रविकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:46 PM

खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत

ठळक मुद्देकटुतेमुळे घातक हार्मोन्स कार्यरत होतात

सांगली : खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत मिरजेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की, कटू बोलण्याने कटुता वाढत जाते. एकमेकांशी विसंवाद झाला तर मने दुखावली जातात. दुखावलेल्या मनांमुळे पुन्हा नकारात्मक मानसिकता वाढीस लागते. वैद्यकीयदृष्टीने आपण याची समीक्षा केली तर वाईट बोलण्याचा परिणाम हा शरीरावर वाईटच होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो, रागावतो, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या मनावरही होत असतात. अशा वाईट गोष्टींमुळे शरीरातील वाईट हार्मोन्स कार्यरत होतात. चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे हार्मोन्स प्रत्येकाच्या शरीरात असतात. जेव्हा आपण चांगले बोलतो तेव्हा चांगले हार्मोन्स कार्यरत होऊन हृदयावरचा ताण कमी होतो आणि माणसाला आनंदी वाटत असते. अशी व्यक्ती हृदयरोगापासून स्वत:ला दूर ठेवू शकते.

एखादी व्यक्ती रागाच्या भरात दुसऱ्या व्यक्तीला काही कटू बोलते तेव्हा वाईट हार्मोन्सचा दुष्परिणाम सुरू होतो. हृदयाकडे जाणाºया वाहिन्यांवर ताण येतो आणि हृदयाच्या आजारांना आपण निमंत्रण देण्यास सुरुवात करतो. वास्तविक एका छोट्याशा चुकीच्या कृतीतून आपल्या शरीरावर इतके मोठे दुष्परिणाम होत असतात, याची कल्पना कदाचित अनेकांना नसते. त्यामुळे ते या गोष्टींचे भान ठेवत नाहीत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गोड बोलत राहण्याची सवय अंगीकारली पाहिजे. चांगले शरीर, चांगले हृदय, चांगले आरोग्य आपल्याला हवे असेल तर गोड बोलावेच लागेल. कितीही कटू प्रसंग आले तरी रागावर नियंत्रण ठेवायला हवे. हे नियंत्रण तुमच्या फायद्याचेच ठरणार आहे. याउलट कसल्याही प्रकारचा राग हा शरीरासाठी घातकच ठरू शकतो.सकारात्मक समाज आणि आरोग्यदायी समाजाची निर्मिती करताना आपण सर्वांनी त्याला गोड बोलून, सुसंवाद साधून हातभार लावायला हवा. यामाध्यमातून आपण समाजाचीही सेवा करू शकतो.‘लोकमत’ने सुरू केलेले हे अभियान अत्यंत चांगले आहे. पुरातन काळापासून जो गोड बोलण्याचा संदेश दिला जात आहे, तो आरोग्यदृष्ट्या प्रत्येकाला व समाजालाही तितकाच लाभदायी आहे. याचा स्वीकार केवळ एका दिवसापुरता नव्हे, तर आयुष्यभर करायला हवा, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली