शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सव्वा कोटी रुपये देऊनही शेरीनाल्याचे पंप बंद का? सांगली महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:21 IST

महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी १ कोटी ३० लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करूनही शेरीनाला योजनेचे पंप आजपर्यंत दुरूस्त होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सांगलीकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी गुरुवारी केला.

ठळक मुद्देउत्तम साखळकर : , ‘एमजीपी’त ताळमेळाचा अभाव

सांगली : महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी १ कोटी ३० लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करूनही शेरीनाला योजनेचे पंप आजपर्यंत दुरूस्त होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सांगलीकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी गुरुवारी केला. महापालिका व जीवन प्राधिकरणातच ताळमेळ नसल्याने योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचेही ते म्हणाले.

साखळकर म्हणाले की, शेरीनाला योजनेवर आतापर्यंत ३२ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तरीही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. या योजनेसाठी संपूर्ण निधी शासनाकडून मिळणार होता. पण जीवन प्राधिकरणाने विहित मुदतीत योजना पूर्ण न केल्याने २०१६ मध्येच शासनाने निधी देण्यास स्पष्ट नकार दिला. आधीच महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना, शेरीनाल्यासाठी निधी उभारण्याचे नवे संकट उभे ठाकले. शासनाकडून निधी मिळणार नसल्याने जीवन प्राधिकरणाने पाच पंप व पाईपलाईनसाठी नवीन अंदाजपत्रक तयार करून २ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीची मागणी महापालिकेकडे केली. त्यापैकी १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी २४ एप्रिल २०१८ रोजी आयुक्तांनी जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केला.

याच काळात शेरीनाल्याचे सांडपाणी उपसा करणाऱ्या तीन पंपांपैकी दोन पंप नादुरुस्त झाले. परिणामी दूषित सांडपाणी नदीपात्रात मिसळले. तरीही जीवन प्राधिकरणाने पंप दुरुस्ती व नवीन पंप खरेदीकडे गांभीर्याने पाहिले नाही. डिसेंबर महिन्यात एक पंप दुरुस्त करून तो जोडला. पण तोही पंप पंधरा दिवसांपूर्वी बंद पडला.ही योजना अद्यापही जीवन प्राधिकरणाकडेच आहे. ती पूर्ण करण्यासाठी आणखी किती रक्कम खर्च होणार, याचा अंदाज नाही. या योजनेतील १४ कामे करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने ५ कोटी ४४ लाखाची मागणी केली आहे, तर धुळगाव येथील वितरण व्यवस्थेसाठी ९ कोटीची गरज आहे. निधी कोणाचा व त्याचा खर्च करणारे वेगळे, असा प्रकार सुरू असल्याने या योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचेही साखळकर म्हणाले.शेरीनाल्यावरील पंप खरेदी व पाईपलाईनसाठी २ कोटी ३२ लाखाची मागणी जीवन प्राधिकरणाने केली. हा निधी वर्ग करण्याबाबत आयुक्तांनी स्थायी समिती अथवा महासभेची मान्यता घेतली नाही. परस्परच १४ व्या वित्त आयोगातून १ कोटी ३० लाख वर्ग केल्याचा आरोपही साखळकर यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी