शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

राज्यस्तरीय महामार्ग, प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना, पुण्यातील बैठकीत निर्णय

By संतोष भिसे | Updated: November 20, 2023 15:39 IST

सांगली : राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष ...

सांगली : राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष आणि पाठपुरावा सुरु आहे. या सर्व बाधित शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनांची एकच संयुक्त राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. १९) झालेल्या व्यापक बैठकीत संयुक्त समितीची घोषणा करण्यात आली. यावेळी शरद पवार, प्रल्हाद गायकवाड, डॉ. ओमन पाटील, विश्वास साखरे, नितीन साळुंखे, विनय कुंभार, प्रसाद घोनंद, प्रकाश केमसे, योगेश मांगले, राजाभाऊ गाढे, दिगंबर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. आंदोलनाला नेमकी दिशा मिळावी आणि राज्यस्तरावर शेतकऱ्यांसाठी एकसारखे शासकीय निर्णय व्हावेत यासाठी संयुक्त समितीचा निर्णय घेण्यात आला.या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी घेतल्या आहेत. त्यांचे वेगवेगळे मूल्यांकन केले जात आहे. मूल्यांकनासाठी वेगवेगळे निकष लावले जात  आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या कामात जमिनींना मिळालेला भाव अन्य महामार्गांसाठी दिला जात नाही. याविरोधात शेतकरी संघर्ष समित्या ठिकठिकाणी लढा देत आहेत. हा लढा एकमुखी होण्यासाठी सर्व समित्या एकाच झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. त्यातूनच महामार्ग व प्रकल्प बाधीत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील बैठकीत महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा झाली. बाधीत क्षेत्राचे योग्य मूल्यांकन, वास्तववादी किंमत, प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये मोबदला, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढण्याचे ठरले.यावेळी संतोष लोखंडे, गुलाबराव चौधरी, गोविंद घाटोड, मारोती मुंढे, धोंडीराम लांबाडे, सुरेश मानमोडे, विलास गावंडे, प्रशांत मानधने, संतोष दहातरे, जगदीश दहातरे, रमेश गावंडे, शिवाजी इंगळे, अनिल शिंदे, दिगंबर मोरबाळे, गणपती येसणे यांच्या राज्य समन्वयक समिती सदस्यपदी निवडी झाल्या. 

सध्या सुरु असणारे प्रकल्पराज्यात सध्या पुणे बंगळुरु हरित महामार्ग, सूरत - चेन्नई हरित महामार्ग, नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग, संकेश्वर - बांदा महामार्ग, पुणे वळण मार्ग, अकोला - नांदेड महामार्ग, पुणे- नाशिक लोहमार्ग, पुणे -नाशिक महामार्ग, मुंबई- नागपूर समृध्दी महामार्ग, पुणे - मिरज लोहमार्ग, गुहागर - विजापूर महामार्ग आदी कामे सुरु आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.

राज्य संघटनेच्या निवडीराज्यव्यापी संघर्ष समितीचे निमंत्रक म्हणून दिगंबर कांबळे, प्रा. दिनकर दळवी, राजन क्षीरसागर, बाळासाहेब मोरे, राजाभाऊ चोरगे, नारायण विभुते,  शिवाजी गुरव यांच्या निवडी झाल्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी