शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा अधिक सज्ज करा : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:09 IST

याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतक-यांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून,

ठळक मुद्दे त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.

सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी, स्थिती नियंत्रणात आहे. त्याबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार व उपाययोजनांबाबत प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदम म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर गेली असल्याने आता अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. या महिन्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने यंत्रणेने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.

परराज्यातील कामगार, मजूर लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे उद्योजकांना त्या दृष्टीने निर्माण झालेली अडचण कशा पध्दतीने सोडविता येईल, यासाठी बैठक घ्यावी. त्यासाठी उद्योजकांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचनाही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, यंदाच्या खरीप हंगाम शेतकºयांना दिलासादायक जाण्यासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. शेतकºयांना खरिपासाठी खते, बी-बियाणे व कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतकºयांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषी यंत्रणेने अलर्ट रहावे व नियंत्रणासाठी आराखडा तयार करावा.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस