शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा अधिक सज्ज करा : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:09 IST

याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतक-यांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून,

ठळक मुद्दे त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.

सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी, स्थिती नियंत्रणात आहे. त्याबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार व उपाययोजनांबाबत प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदम म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर गेली असल्याने आता अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. या महिन्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने यंत्रणेने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.

परराज्यातील कामगार, मजूर लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे उद्योजकांना त्या दृष्टीने निर्माण झालेली अडचण कशा पध्दतीने सोडविता येईल, यासाठी बैठक घ्यावी. त्यासाठी उद्योजकांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचनाही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, यंदाच्या खरीप हंगाम शेतकºयांना दिलासादायक जाण्यासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. शेतकºयांना खरिपासाठी खते, बी-बियाणे व कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतकºयांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषी यंत्रणेने अलर्ट रहावे व नियंत्रणासाठी आराखडा तयार करावा.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस