शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा अधिक सज्ज करा : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:09 IST

याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतक-यांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून,

ठळक मुद्दे त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.

सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी, स्थिती नियंत्रणात आहे. त्याबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार व उपाययोजनांबाबत प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदम म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर गेली असल्याने आता अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. या महिन्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने यंत्रणेने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.

परराज्यातील कामगार, मजूर लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे उद्योजकांना त्या दृष्टीने निर्माण झालेली अडचण कशा पध्दतीने सोडविता येईल, यासाठी बैठक घ्यावी. त्यासाठी उद्योजकांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचनाही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, यंदाच्या खरीप हंगाम शेतकºयांना दिलासादायक जाण्यासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. शेतकºयांना खरिपासाठी खते, बी-बियाणे व कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतकºयांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषी यंत्रणेने अलर्ट रहावे व नियंत्रणासाठी आराखडा तयार करावा.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस