शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केेला.

महापालिकेने सांगली, मिरज, कुपवाड शहरांत बुधवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केलेला असतानाच पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त सर्व व्यवहार शंभर टक्के बंद राहणार आहेत.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५६८ वर पोहोचली आहे. ४० रुग्णांचा मृत्यूही झाला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. प्रशासनाशी चर्चेनंतर बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल.

पाटील म्हणाले की, जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा अगदीच काठावर होत आहे. तो मिळविण्यासाठी प्रचंड ताकद लागत आहे. औषधांबाबतही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच नागरिकांनी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

दरम्यान, पालकमंत्री १ मेपासून विविध तालुक्यांना भेटी देऊन कोरोनास्थितीचा आढावा घेत आहेत. रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य काही भागात परिस्थिती भयावह आहे. तेथे कोरोना नियंत्रणासाठी कार्यवाहीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चौकट

केवळ वैद्यकीय सेवा सुरू

जिल्ह्यात काही गावांनी सोमवारपासूनच गावपातळीवर जनता कर्फ्यू लागू केला आहे. काही ठिकाणी आठवडाभरासाठी तर काही ठिकाणी पंधरवड्यासाठी व्यवहार बंद ठेवले आहेत. ही गावेदेखील आता आपोआपच जिल्हास्तरीय लॉकडाऊनमध्ये समाविष्ट झाली आहेत. या काळात फक्त वैद्यकीय सेवा व तिच्याशी निगडित व्यवहार सुरु राहतील. सध्याची सकाळी ७ ते ११ या वेळेची सवलत लागू नसेल.