शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केेला.

महापालिकेने सांगली, मिरज, कुपवाड शहरांत बुधवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केलेला असतानाच पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त सर्व व्यवहार शंभर टक्के बंद राहणार आहेत.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५६८ वर पोहोचली आहे. ४० रुग्णांचा मृत्यूही झाला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. प्रशासनाशी चर्चेनंतर बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल.

पाटील म्हणाले की, जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा अगदीच काठावर होत आहे. तो मिळविण्यासाठी प्रचंड ताकद लागत आहे. औषधांबाबतही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच नागरिकांनी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

दरम्यान, पालकमंत्री १ मेपासून विविध तालुक्यांना भेटी देऊन कोरोनास्थितीचा आढावा घेत आहेत. रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य काही भागात परिस्थिती भयावह आहे. तेथे कोरोना नियंत्रणासाठी कार्यवाहीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चौकट

केवळ वैद्यकीय सेवा सुरू

जिल्ह्यात काही गावांनी सोमवारपासूनच गावपातळीवर जनता कर्फ्यू लागू केला आहे. काही ठिकाणी आठवडाभरासाठी तर काही ठिकाणी पंधरवड्यासाठी व्यवहार बंद ठेवले आहेत. ही गावेदेखील आता आपोआपच जिल्हास्तरीय लॉकडाऊनमध्ये समाविष्ट झाली आहेत. या काळात फक्त वैद्यकीय सेवा व तिच्याशी निगडित व्यवहार सुरु राहतील. सध्याची सकाळी ७ ते ११ या वेळेची सवलत लागू नसेल.